Wednesday, January 28, 2015

7:22 PM

Now Wedding Invitation through SMS and "Call Recording"



लग्नाचे निमंत्रणही आता ’एसएमएस’व ’रेकॉर्डिंग कॉल’ वरून
निमंत्रणाची पारंपारिक पद्धत पडतेय मागे


लग्नाचे निमंत्रण घेउन लोक बारश्याला नाही गेले म्हणजे मिळवलं ... असं लोक पूर्वी उपहासाने म्हणत असत. कारण पूर्वी दळणवळणाची साधने मर्यादित होती त्यामुळे गावोगावी पाहुणे, आप्तेष्टांना लग्नपत्रिका पाठविणे सर्वात जोखमीचे काम मानले जात असे .लग्नसोहळा हा जीवनातील आनंदाचा आणि अविस्मरणाचा सोहळा असला तरी तो धावपळीचा सोहळा असतो.आता आधुनिक काळात मात्र परिस्थिती बदलली आहे. लग्नाचे निमंत्रणही आता मोबाईल ’एसएमएस’व ’रेकॉर्डिंग कॉल’ वरून जात असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता प्रसार आणि धावपळीचे युग यामुळे घरी जाऊन लग्नाचे निमंत्रण देण्याची पारंपारिक पद्धत काहीशी मागे पडू लागली आहे. चाकण सह लगतच्या ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी चांगली आर्थिक परिस्थिती असणारी,राजकारणातील पदाधिकारी,दिग्गज मंडळी अशी हायटेक निमंत्रणे पाठवीत असत .आता मात्र या सुविधा महागाईच्या जमान्यातही काहीशा स्वस्त झाल्याने सर्रास पणे भ्रमणध्वनीतील संदेश यंत्रणेचा व व्हाईस रेकॉर्डिंग कॉलही वापर होत आहे. कुठे जोड म्हणून तर कुठे पर्याय म्हणून भ्रमणध्वनीद्वारे लग्नपत्रिका एसएमएस करण्यात येत आहे. स्वस्त आणि विश्‍वासार्ह माध्यम म्हणून भ्रमणध्वनीतील संदेश यंत्रणा व व्हाईस रेकॉर्डिंग कॉलही पुढे येत आहे. आधुनिक युगात माणूस एकमेकांपासून रोजगारानिमित्त दूर अंतरावर गेला.

पण, त्यांच्यातील स्नेहबंध जपण्याचे काम भ्रमणध्वनीने केले आहे. घरचे लग्न सर्वांसाठीच जिव्हाळ्याची बाब असते. दूर अंतरावरील नातेवाईक, मित्रमंडळीने विवाहसोहळ्यात उपस्थित राहावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, लग्नपत्रिका पाठवावी, तर टपालखात्याच्या कृपेने वेळेवर पोचेलच याची खात्री नसते. त्यामुळे ग्रामीण भागातही आता भ्रमणध्वनीतील संदेश यंत्रणेतच लग्नपत्रिका तयार करून आप्तांना पाठविली जात आहे. लग्नपत्रिकेपेक्षा वेगवान आणि स्वस्तात हे काम होत असल्यामुळे याचा वापर मोठ्याप्रमाणात होत आहे. काही वर्षांपूर्वी वैशिष्ट्यपूर्ण लग्नपत्रिका छापण्याची क्रेझ’ होती. राजेशाही पद्धतीच्या पत्रिका ते नव्या तंत्राच्या आधारे केलेल्या आकर्षक पत्रिका असे त्याचे स्वरुप होते. पत्रिकेत भरगच्च मजकूर असायचा. संयोजकांच्या नावांची भलीमोठी यादी व ठरलेली वाक्यरचना अशा साचेबद्ध पद्धतीने पत्रिका छापली जात होती. या पत्रिका प्रत्यक्ष घरी जाऊन नातलगांना हातात देत लग्नास येण्याचे आग्रहपूर्वक निमंत्रण दिले जायचे. पुढे या पत्रिका पोस्टाने किंवा कुरिअरद्वारे पाठविल्या जाऊ लागल्या. ही प्रक्रिया सुद्धा वेळखाऊ वाटू लागली म्हणून की काय आता निमंत्रणासाठी एसएमएस’चा वापर केला जाऊ लागला आहे. भलीमोठी निमंत्रण पत्रिका आता एसएमएस’मध्ये बसवून पाठविण्याची नवी पद्धत चाकण सह लगतच्या पंचक्रोशीत सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

याविषयी अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या काही संबंधितांच्या नातेवाईक मंडळीनी सांगितले की, लग्नपत्रिका टपालखात्याने पाठवावी, तर तिला पोचायला किती दिवस लागतील, याचा नेम नाही. आपल्याला लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत यादीमधून सुटलेल्या लोकांची नावे आठवतात तर काही जवळची मंडळी निमंत्रण देण्याची राहून जातात. त्यामुळे त्यांना लग्नाला निमंत्रित करण्यासाठी टपालखात्याचा वापर करणे शक्य होत नाही. भ्रमणध्वनी करावा तर लग्नाच्या घाईगडबडीत तेही फारसे शक्य होत नाही. अशा स्थितीत भ्रमणध्वनीतील संदेश यंत्रणेवर किंवा एकाचवेळी रेकॉर्डिंग केलेल्या व्हाईस कॉल वरून अनेक लोकांना लग्नाचे निमंत्रण पाठविता येते. हे सोपे व वेळेची बचत करणारे आहे. तसेच विश्‍वासार्हही आहे. भ्रमणध्वनी आता तळागाळापर्यंत पोचला आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत सहज निरोप पोचविण्याचे काम वेगवान पद्धतीने पूर्ण होते. मात्र लग्न सोहळ्यामुळे एकाच वेळी अनेक जबाबदार्‍या पार पाडण्यार्‍या लग्नसोहळ्याच्या कारभार्‍याच्या या नामी शोर्टकट मुळे मोबाईल च्या मेसेज इनबॉक्स मध्ये धडकणार्‍या संदेशाने व एकाचवेळी अनेकांना प्राप्त होणार्‍या रेकॉर्डिंग व्हाईस कॉल मुळे मोबाईलधारक हैराण झाले आहेत.

Wedding Invitation Now esaemaesava "Call Recording" from
The traditional method padateya before invitation


That they do not think they were saying ... won barasyala people take wedding invitation Tee ago. For the past had limited communication tools so villages guest, aptestanna lagnapatrika send Though most venture ceremony that lagnasohala of life and the joy of being considered dhavapalica avismaranaca ceremony asatoata situation changed, however, is the modern period. Wedding invitations go mobile 'esaemaesava "Call Recording" Since going from modern technology and the increasing spread of this method is the traditional date dhavapalice invitation to a wedding and had to fall back to the house is interesting. Economic conditions in rural areas, the cost of holding the Chakan with a good few days ago, political office, the church, the hi-tech giants would send invitations ata The messaging feature is the use of voice recording bhramanadhvanitila kolahi system and dumped common reasons jamanyatahi caused by low inflation. Lagnapatrika SMS bhramanadhvanidvare option where it is as if a pair where. So cheap and reliable medium bhramanadhvanitila message is coming along kolahi and Vice-recording system. The man went off rojagaranimitta away from each other in the modern age.

However, their work is done on mobile phones snehabandha cherishes. Extreme marriage is all a matter of affection. Distance relatives, friends vivahasohalyata be present, that is everyone's desire. But, lagnapatrika send, but not sure tapalakhatya of grace timely pocelaca. Therefore, it is now being sent to rural areas by creating a raised lagnapatrika yantranetaca bhramanadhvanitila message. Since this work is the use of a large lagnapatrike than is fast and cheap. A few years ago characteristic lagnapatrika prints Crazy 'was. Methods magazine that it was his royal person on the basis of the technology in the new magazine attractive. Magazine used to be roughly the text. Price list of illegal names and the organizers of the magazine was printed in such a way sacebaddha construction. The magazine gave the invitation to go to the hands of the office and went home very strongly to come to the wedding. Looking ahead, the magazine began to be sent by post or kuriaradvare. What is the process began to be used as an invitation esaemaesaca also felt theirs. We should invite the magazine is now starting to appear that the costs of pancakrosita with a new method to send sit esaemaesa in Chakan.

Some of the relatives concerned about the church, said the use of such technology, lagnapatrika postal mail, but she will not reach many days, it does not name. You are invited to stand near the church, but remember some of the names of people escaped from the list divasiparyanta previous marriage. Therefore, they can not use postal invited to the marriage. Mobile should be pretty much the marriage ghaigadabadita not possible. In this case bhramanadhvanitila can send a message to the system or a wedding invitation from many people at the same time recording the voice call. It is that easy and time saving. And is reliable. Mobile is now suppressed and the grass root level. So complete was the fastest way to easily work pocavinyace message to everyone. At the same time many of the responsibilities of the marriage sohalyamule padanyarya lagnasohalya of karabharya roots of this admirable Shortcut receiving many simultaneous voice recording, and the word of the message in the Inbox dhadakanarya mobile calls per mobile are serious.


lagna patrika matter indian wedding cards lagna patrika marathi wedding marathi lagna patrika marathi matrimonial marathi lagna marathi ukhane for marriage marathi matrimonial sites marathi matrimony sites marathu lagna patrika matter in marathi lagna patrika matter in hindi gujarati lagna patrika matter marathi lagna patrika matter marathi lagna patrika matter in marathi marathi lagna patrika matter poem marathi lagna patrika matter samples lagna patrika majkur vivah patrika matter in marathi lagna patrika samples marathi patrika matter lagna patrika format patrika matter lagna patrika marathi matter lagna patrika in marathi majkur lagna patrika in marathi lagna patrika sample lagna patrika format marathi lagna patrika marathi majkur marathi lagna patrika wordings lagna patrika format in marathi pdf marathi lagna patrika format pdf marathi lagna patrika samples lagna patrika marathi lagna patrika samples in marathi marathi lagna patrika majkur lagna patrika samples marathi marathi lagna patrika kavita lagna patrika kavita in marathi lagna patrika majkur in marathi marathi lagna patrika majkur pdf lagna patrika marathi format marathi kavita lagna patrika marathi lagna patrika kavita sample lagna patrika wordings in marathi marathi patrika invitation matter marathi vivah patrika patrika majkur marathi patrika majkur marathi patrika format vivah patrika sample patrika in marathi marriage patrika format in marathi marathi patrika marathi patrika kavita marathi charolya lagna marathi vivah kavita vivah patrika patrika marathi wedding matter in marathi lagna kavita lagna in marathi lagna kavita in marathi lagna marathi kavita marathi wedding matter marathi lagna charoli marathi lagna invitation marathi lagna kavita www.marathi lagna patrika.com lagna marathi kankotri matter marathi majkur marathi kavita lagna marathi kavita on lagna wedding cards matter in marathi marathi poem on marriage marathi wedding cards matter wedding cards in marathi wording marathi marriage invitation wordings kankotri format marathi wedding cards marathi wedding kavita marriage kankotri marathi kavita on marriage wedding patrika marathi poem in marathi patrika for marriage www.marathi.com kavita www.com marati maharashtrian marriage poem in marathi marathi kavita for marriage marriage invitation in marathi marriage patrika marathi poem free download lagna kankotri free marathi poem marathi marriage biodata marathi marriage kavita download marathi poem marathi poem download poem of marathi best poem in marathi wedding marathi wedding sms in marathi marathi lagna geet marathi matrimony pune marriage lagna vivah lagna marathi in marathi
6:13 PM

पंगत ते बुफे व्हाया लग्न मंडप

पंगत ते बुफे व्हाया लग्न मंडप
द्वारकानाथ संझगिरी

मुंबईतल्या लग्नाचा थाटमाट, स्टाइल मी गेल्या कित्येक वर्षांत बदलताना पाहिली आहे. तसंच वयोमानाप्रमाणे लग्न एन्जॉय करण्याची वृत्तीसुद्धा बदलत जाते. आठवणींच्या पायऱ्यांवरून खाली उतरून तळाला गेल्यावर मला बालपणापासून पाहिलेली लग्नं आठवतात.

काही दिवस माझे लग्नात हजेरी लावण्यात जातायत. लग्न या विषयावर सर्व भाषांमध्ये शेकडो विनोद आहेत. लग्न करणं म्हणजे पारतंत्र्य स्वीकारणं, बंदिवास स्वीकारणं हे वारंवार बोललं जातं. परवा एका कार्यक्रमात मीसुद्धा बोलून गेलो- ‘सर डॉन ब्रॅडमन हा महानतम फलंदाज का, तर त्याने आयुष्यात एकदा केलेली चूक पुन्हा केली नाही. लग्नसुद्धा एकदाच केलं.’ लोक हसले. पण तरीही माणसं लग्न करतात. एक घटस्फोट झाला तर पुन्हा करतात. किशोरकुमारने तर चार वेळा केलं. त्यातलं, योगिता बालीबरोबरचं त्याचं लग्न हे मधुबालाच्या मृत्यूमुळे झालेली ‘व्हॅकन्सी’ भरण्यासाठी केलेलं लग्न होतं. ते महिन्याभरात मोडलं. पण त्याने पुन्हा लीना चंदावरकरबरोबर लग्न केलंच. एलिझाबेथ टेलरची लग्नं तर सुप्रसिद्ध आहेत. एका अतिशय सुप्रसिद्ध पियानिस्टची मुलाखत एकदा बीबीसीवर सुरू होती आणि त्याला प्रश्न विचारला गेला की, ‘तू पोटापाण्यासाठी काय करतोस?’ तो टिपिकल ब्रिटिश टंग इन चिक स्टाइलमध्ये म्हणाला, ‘‘मी एलिझाबेथ टेलरच्या लग्नात पियानो वाजवतो.’’ सध्या लिव्ह इन रिलेशनशिपचं वारं थोडंफार सुटलेलं असलं आणि लग्नाच्या झाडावरची चार पानं गळली तरी नवी पालवी फुटतेच.
मुंबईतल्या लग्नाचा थाटमाट, स्टाइल मी गेल्या कित्येक वर्षांत बदलताना पाहिली आहे. तसंच वयोमानाप्रमाणे लग्न एन्जॉय करण्याची वृत्तीसुद्धा बदलत जाते. आठवणींच्या पायऱ्यांवरून खाली उतरून तळाला गेल्यावर मला बालपणापासून पाहिलेली लग्न आठवतात. तेव्हा दोन दिवस आधीपासून नातलग मंडळी जमत असत. भेंडय़ा, उखाणे, पत्ते वगैरे गोष्टींना ऊत यायचा. त्यावेळी चुलत, आते, मावस, मामे भावंडं वगैरे एका घट्ट कौटुंबिक धाग्याने जोडलेली असायची. फारसे कुणी परदेशात वगैरे नसत. एकत्रित कुटुंब पद्धत कोसळलेली नव्हती. पण शेवटच्या टप्प्यावर होती. लहानपणी लग्न हा माझ्यासाठी मोठ्ठा इव्हेंट असायचा. अत्यंत आनंददायी अदा! कारण अभ्यासाला आणि शाळेला सुट्टी, सर्व भावंडं जमली की खेळ, धमाल वगैरेला ऊत यायचा. लग्नाच्या निमित्ताने नवे कपडे, बूट वगैरे, गोड पदार्थाची लयलूट आणि आईस्क्रीम! त्या वयात लग्न आणि स्वर्ग हे माझ्यासाठी समानार्थी शब्द होते. त्यावेळच्या जेवणावळीची धमाल वेगळीच होती. एकत्र पंगत, जबरदस्त आग्रह, साजूक तुपाचा घमघमाट, पंचामृत, मसालेभात, जिलब्या वगैरे आठवलं की त्या क्षणी जठराग्नी भडकतो. सर्वसाधारणपणे त्यावेळच्या लग्नात गोड पदार्थ हा जिलेबी असायचा. वधूपक्षाचा खिसा गरम असेल तर मग श्रीखंड किंवा आंब्याचा मोसम असेल तर आम्रखंड. आमरस वगैरे! वधूपक्ष ‘श्रीमंत’ असेल तर बासुंदी! वधूपक्ष त्या काळात बऱ्याचदा सर्व खर्च करायचा, म्हणून त्यांच्यावर बरंच अवलंबून असायचं. नको तेवढा आग्रह व्हायचा आणि मंडळीसुद्धा नको तेवढी खायची. तीस जिलब्या, पन्नास जिलब्या अशी स्पर्धा लागायची. ‘डाएट’ हा शब्द अस्तित्वात असला तरी त्याला माहात्म्य प्राप्त झालेलं नव्हतं. त्या काळातली मंडळी डाएटचा अर्थ ‘डाय इटिंग’ असाच घेत. पोट सुटलेली मंडळी ही ‘सुखवस्तू’ मानली जात. वाढप्यांबरोबर खास आग्रह करणारी ‘घरची’ मंडळी असत. वरपक्ष, वधूपक्षाच्या खिशाच्या जोरावर जोरदार आग्रह करत असे. आग्रह अर्थात जिलेबी-श्रीखंड, मसालेभात, भजी वगैरे. वैद्यकशास्त्र ‘धोकादायक’ मानतं अशा पदार्थाची. त्यावेळी अनेकांना आपल्याला मधुमेह किंवा कोलेस्टेरॉल आहे हे ठाऊकही नसायचं. अज्ञानातल्या सुखात ते मस्तपैकी डुंबायचे. जेवणाच्या पंक्तीची सुरुवात बऱ्याचदा श्लोकाने व्हायची. त्यावेळी मध्यमवर्गीयांना मराठीच काय, संस्कृतही यायचं. अशाच एका लग्नातला एक प्रसंग मी विसरणार नाही. ‘मोस्ट एम्बॅरसिंग मोमेंट’ म्हणावा असा प्रसंग माझ्या एका नातेवाईकाच्या बाबतीत घडला. लग्नातली जेवणाची पंगत लागली. कुणीतरी धीरगंभीर आवाजात ‘वदनी कवळ घेता’ सुरू केलं आणि त्याचा शेवट ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ होणार आणि मंडळी पहिला घास घेणार एवढय़ात नगारा वाजावा तसा एक माणूस पादला. आवाजाच्या दिशेने सर्वाच्या नजरा गेल्या. मी त्या माणसाच्या जागी असतो तर सीतेप्रमाणे जमीन दुभंगून मला पोटात घेईल तर बरं होईल असं मला वाटलं असतं. तो माणूस न लाजता म्हणाला, ‘गिरणीचा भोंगा कधी ऐकला नाही का? हे नैसर्गिक आहे. म्हणा पुंडलिक वरदा हारी विठ्ठल..’ आता एम्बॅरस होण्याची वेळ इतरांची होती.

त्यावेळी पहिल्या पंक्तीला ऑफिसात जाणारी आणि घाईत असलेली मंडळी जेवायला बसत. शेवटची पंगत ही अगदी जवळच्या नातेवाईक मित्रांची. जेवणाच्या दृष्टीने पहिली पंगत ही उत्कृष्ट असे. सर्व ताजं, मुबलक वगैरे! विशेषत: ताक किंवा मठ्ठा पहिल्या पंक्तीत उत्तम असे. त्यानंतर ताक किंवा मठ्ठय़ाची डेन्सिटी (घनता) कमी होत जायची. शेवटची खास पंगत सोडली, तर त्या पंगतीआधीच्या पंक्तीत अस्सल ताक आणि पाणी यांचं कॅपिटल शेअरिंग एकोणपन्नास टक्के आणि एक्कावन टक्के असे. कंपनी ‘पाण्याच्या’ ताब्यात असे. त्यामुळे घरचं लग्न असेल तर शेवटची पंगत, नाहीतर पहिली पंगत जेवणास उत्तम हा माझा सिद्धांत होता. पण त्याच वेळी अवास्तव आग्रहामुळे मी अन्नाची प्रचंड नासाडी पाहिलीए. जे ताटात टाकलं जाई त्यावर अर्धपोटी जनतेतली कुटुंबच्या कुटुंब जेवली असती आणि त्यांनी तृप्तीचा ढेकर दिला असता. ही जाणीव पुढे पुढे व्हायला लागली.
सकाळच्या जेवणाच्या वेळी उखाणे वगैरे प्रकार चाले. आजही चालतो. आता मॉडर्न उखाणे असतात. त्याची पुस्तकंही मिळतात. पण, आजचं लाजणं खोटं असतं. त्यावेळचं लाजणं खरंच लाजणं असायचं. जुळवलेल्या लग्नात आणि त्यात लग्न पटकन ठरलं असेल तर एकमेकांना जाणून घ्यायला वेळही मिळायचा नाही. वधूसह वधूपक्ष सतत दबावाखाली वावरताना दिसायचा.

संध्याकाळच्या रिसेप्शनला मुली मेकअप करायच्या, पण तो चार तासांचा प्रकार नसायचा. रिसेप्शन वेळेवर सुरू व्हायचं. नवरा सासऱ्याने दिलेल्या पैशाने सूट शिवून रिसेप्शनला घालायचा. फोटोग्राफर बऱ्याचदा मुलीकडचा असायचा. मला आठवतंय, माझ्या एका मित्राच्या लग्नात फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर हसूच नव्हतं. शेवटी त्या मित्राचा भाऊ जोराने म्हणाला, ‘‘अरे तुला हसायला हरकत नाही. फोटोचा खर्च तिकडून आहे.’’ तो हसलाच, पण असं म्हणतात की, त्याचे सासरेसुद्धा त्याचं लग्न जमल्यापासून पहिल्यांदा हसले. रिसेप्शनला जेवण ही पद्धत नव्हती. आर्थिक कुवतीप्रमाणे रिसेप्शनला मसाला दूध, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम असे. लग्नात कसाटा आईस्क्रीम असणं हे उच्चभ्रूपणाचं व्यवच्छेदक वगैरे म्हणतात तसं लक्षण होतं. लहानपणी लग्नात सहा-सात कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या संपवणे किंवा सहा-सात आईस्क्रीम खाणे ही रोमहर्षकता मानली जायची. एकदा नववीत वगैरे असताना मी आणि माझा वर्गमित्र मोहन वैद्य शिवाजी पार्कला फिरत होतो. स्काऊट पॅव्हेलियनमध्ये कुठलंसं लग्न सुरू होतं. बाहेरून कसाटा आईस्क्रीम कापताना माणसं दिसली. दोन फलंदाज एकेरी धाव चोरताना फक्त एकमेकांकडे बघतात आणि नजरेने बोलतात. तसं आम्ही पाहिलं, नजरेने बोललो आणि रिसेप्शनमध्ये शिरलो. एक आईस्क्रीम संपल्यावर दुसऱ्या आईस्क्रीमकडे मोर्चा वळवताना लग्नातल्या मंडळींना ‘आम्ही घुसल्याचा’ संशय आला, असं आम्हाला वाटलं. माझी पाचावर धारण बसली. मोहन वैद्य शाळेपासूनच नाटकात कामं करायचा. तो उठला आणि घरचाच असल्याप्रमाणे आईस्क्रीम घेऊन येणाऱ्याला ‘गाईड’ करायला लागला. ‘इथे द्या. अजून भाऊसाहेबांना मिळालेलं नाही. मावशी, आईस्क्रीम खाल्लंत? आईस्क्रीम घेतल्याशिवाय जायचं नाही.’ वगैरे वगैरे! मला नेहमी वाटतं, मोहन वैद्य एका विशिष्ट काळानंतर नाटकापासून दूर गेला, तेव्हा मराठी नाटय़भूमी एका चांगल्या नटाला आणि कदाचित नाटय़लेखनाला पारखी झाली. नववीत असताना दुसऱ्याच्या रिसेप्शनमध्ये शिरून तिथल्या तिथे प्रसंग लिहून इन अ‍ॅक्ट करणं हे केवढं कसब! त्या दिवशी खाल्लेली पाच कसाटा आइस्क्रीम ही मोहनच्या कसबाचं बक्षीस होतं. मला आइस्क्रीमवरून आणखीन एक प्रसंग आठवतो. एका नात्यातल्या रिसेप्शनला दिलेल्या नऊच्या वेळेनंतर काही मंडळी आली. आइस जवळजवळ संपलं होते. कोल्ड्रिंकवाला दूर होता. एका नातेवाईकाने भूमिका घेतली की साडेनऊ झाले आहेत. रिसेप्शनची वेळ संपलीए. त्यामुळे आपण त्यांना काही देणं लागत नाही. मी त्याच्या हातातल्या मोठय़ा प्रेझेंटकडे पाहून म्हटलं, ‘ते देणंही लागत नाही.’ असं त्यांनी म्हटलं तर. शेवटी आइस्क्रीमचे दोन तुकडे जमा केले आणि मी दोघांना दिले. एकाने माझ्याकडे पाहिलं आणि फक्त म्हटलं, ‘टेस्टला दिले आहेत? आमच्याकडे टेस्टलाही यापेक्षा जास्त देतात.’ माझा चेहरा किती पडला असावा. उचलायला खूपच कष्ट झाले. कॉलेजात एका सुंदर मुलीने नकार दिल्यावरही इतका कधी पडला नव्हता.

‘आहेर’ हा लग्नातला त्यावेळी महत्त्वाचा भाग होता. तो नीट सांभाळून ठेवून त्याची नोंद करण्यासाठी एक खास माणूस ठेवलेला असायचा. तो अत्यंत विश्वासातला माणूस असायचा. आमच्या संझगिरी घराण्यातलं लग्न असेल, तर माझे काका, ज्यांना आम्ही प्रेमाने पदूकाका म्हणायचो, ते आहेर लिहायला असायचे. त्यांच्या लग्नात फक्त आहेर लिहिला नाही. त्यांची तशी तयारी असती तर त्यांच्या लग्नात आहेर स्वीकारल्यानंतर त्यांनी सहज लिहिलासुद्धा असता. दुसऱ्या दिवशी पाकीट आणि वस्तूंची चांदी काढणं हा आनंददायी प्रसंग वाटायचा. घेणं कधी आनंददायी नसतं. कधी कधी आहेराच्या रकमेवरून ‘प्रेम’ ठरवलं जायचं. ते यातना देणारं असायचं. पुढे सामाजिक जाणीव झाल्यावर आहेर हा सामाजिक कर वाटायचा.

मी वयात आल्यानंतर लग्न फारसं बदललं नव्हतं. फक्त गिरगावातले लक्ष्मीबाग, विष्णूबाग या पलीकडे आम्हा सारस्वतांची लग्न व्हायला लागली. माझी दृष्टी थोडी बदलली. ती लग्नातल्या सुंदर मुलीवर खिळायची. लग्नात लग्न जुळवून टाकायचा हिशेब माझा काही जुळला नाही. त्यावेळी सुंदर मुलगी आवडली की, प्रेम आणि लग्न या दोन पायऱ्या पुढे असत. आता आवडली की, मैत्री, मग मजा, मग इतरत्र स्कोप नसेल तर प्रेम आणि पुढे पटलं तर लग्न इतक्या पायऱ्या आल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत लग्न बदललं. आता हॉल पुरत नाहीत. त्यामुळे मैदानं आली. आता डेकोरेशन्स डोळे दिपवतात. संध्याकाळचं आइस्क्रीम जाऊन बुफे आला. बुफे प्रांताच्या सीमा ओलांडतोच, पण बऱ्याचदा देशाच्या सीमा ओलांडतो. मराठी माणूस आता पंचतारांकित हॉटेलातही रिसेप्शन ठेवतो. माझ्या लहानपणी लग्नात बॅन्ड असायचा. आता लग्नापूर्वी संगीत असतं. आता लग्न हा लाखांचा इव्हेंट झालाय. ओलावा किंचित कमी होऊन तो शोकेस आयटेम झालाय. या लग्नात मी पंचामृत, मसालेभात, ते प्रेमाने वाढणं नक्कीच मिस करतो. पण एक चांगली गोष्ट झालीए. आहेर नावाचा सामाजिक जिझिया कर आता गेलाय. निदान रिसेप्शनमधून! नातेवाईक मंडळी आहेर करतात, पण एक संस्कार म्हणून!

आज लग्नाला जाताना मी पदार्थ शोधत नसतो. सुंदर मुली शोधत नसतो. (बायकोचा विश्वास बसणं कठीण आहे. पण कधीतरी मला असत्य, सत्य सांगितल्याप्रमाणे सांगायलाच हवं.). मी हजेरी लावतो आणि वधू-वराच्या आनंदात सामील होतो.
6:05 PM

Numerology - Bagyank

भाग्यांक

संख्याशास्त्रात मूलांकाबरोबर भाग्यांकही तितकाच महत्त्वाचा असतो. मूलांकात केवळ जन्मतारखेचा अंतर्भाव असतो, पण भाग्यांकात जन्मतारीख, जन्ममहिना व जन्मवर्ष यांचा समावेश असतो. या तिन्हीची बेरीज केली असता त्या बेरजेचा जो एकांक येतो त्यास भाग्यांक असे म्हणतात.
उदा., १९-३-१९४२ चा भाग्यांक काढू.
१+९+३+१+९+४+२=२९= २+९= ११= १+१= २
हा वरील जन्मतारखेचा भाग्यांक. मूलांकाबरोबर भाग्यांकाचा आधार घेऊन त्या व्यक्तीच्या स्वभावाच्या अनेक छटा माहीत करून घेता येतात.
भाग्यांक एक : लहान वयातच नेतृत्वाची आवड निर्माण होते. उत्तम आत्मविश्वास असतो. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून ही माणसे वागतात. स्वभाव मनमोकळा, स्वतंत्र विचार तसेच दिलदार वृत्तीने ही माणसे जगतात. उच्च पातळीवरून आपले विचार दुसऱ्यास पटवून देतात. हाताखालच्या व्यक्तीस उत्तम सहकार्य देतात. यांच्या विशाल मनोवृत्तीमुळे यांच्या सभोवतालचा परिवार यांच्याबरोबर कायम स्वरूपात राहतो. नातेवाइकांकडून मिळणाऱ्या पैशाचा योग्य उपयोग करा. नोकरी-धंद्यातले वादविवाद वाढवू नका. अतिमहत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. घाई करू नका. आपले विचार दुसऱ्यावर कधीही लादू नका.
भाग्यांक दोन- उत्तम व्यवहारचातुर्य हा यांचा सर्वोत्तम गुण आहे. सहकार्याने कामाचा उरक उत्तम रीतीने करतात. वक्तृत्वाची छाप समोरील व्यक्तीवर पडते. मित्रपरिवार वाढत असतो. पण जिद्दी, हट्टी स्वभावामुळे खूप वेळा नाराजीचे प्रसंग ओढवतात. हे लोक सार्वजनिक क्षेत्रात घेतलेल्या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडतात. यांना पैशाची किंमत कळत नाही. बराच पैसा उधळतात. यांनी अधिक भावनावश होऊन प्रेमप्रकरणात भाग घेऊ नये. चूक झाली तर लगेच माफी मागून मोकळे व्हावे. नकारात्मक विचार करण्याची सवय सोडून द्या. अकारण वाटणाऱ्या भीतीचा शेवट करावा आणि भयमुक्त व्हावे.
भाग्यांक तीन- यांच्यात उत्तम आत्मविश्वासाला साजेलसे सद्गुणही असतात. कल्पक बुद्धी असते. नोकरीधंद्यात आपल्या हुशारीने ही माणसे पुढे जातात. प्रामाणिकपणा, धडाडी, दृढनिश्चय, कर्तृत्वावर यांचा पूर्ण विश्वास असतो. धार्मिक व सामाजिक कार्यात यांचा उत्तम सहभाग असतो. या व्यक्ती धार्मिक, सहिष्णू असल्या तरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची यांची धारणा असते. सुख:दुखात स्वत:ला व दुसऱ्याला सावरण्याची ताकद असते. यांच्यापाशी असलेला संयम यांच्यातील साधुत्व टिकवेल. मात्र धार्मिक बाबतीत खूप हळवेपणाने वागू नका. हळू आवाजात, सावकाशपणे बोलून आपले विचार समोरील व्यक्तीस समजून द्या.
भाग्यांक चार- यांना ‘शांतिदूत’ म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. . जाहीरपणे बोलणे, भाषण करणे आदी गोष्टी यांना मनापासून आवडत नाहीत. खासगीत मात्र बोलून समोरच्या माणसाला आपले मत कसे बरोबर आहे ते पटवून देतील. यांनी उद्योगधंदा करताना जाणकाराचा सल्ला घ्यावा किंवा आपली कुवत ओळखून धंद्यात भाग घ्यावा. निर्थक कामात पैसा गुंतवून या व्यक्ती कधीकधी स्वत:ची फसवणूक करवून घेत असतात. आपल्या साधेपणाचा फायदा इतरांना घेऊ देऊ नका. तसेच मित्राची पारख करून घ्या.
भाग्यांक पाच- धडाडीने सामोरे जाण्याची हिंमत या व्यक्तींपाशी उत्तम असते. बुद्धिमान, विचार करण्याची वेगळी पद्धत यामुळे या व्यक्ती समाज व राजकारणात खूप पुढे जातात. यांच्यापाशी उत्तम वक्तृत्व असते. आर्थिक आवक उत्तम असते, पण उधळपट्टीत सारा पैसा घालवतात. उगाच मोठेपणा करणे हा यांचा अवगुण आहे. नातेवाईक, मित्रमंडळीत वाद घालू नका. वेळेचा योग्य वापर करा. सल्ला देण्यापेक्षा सल्ला विचारा. आपल्या सर्व गोष्टी जगाने ऐकाव्यात हा हेका सोडून द्या.
भाग्यांक सहा- जगात प्रेमाची सत्ता कायम चालते हे तत्त्वज्ञान ही माणसे मनोमन मानत असतात. अतिशय प्रयत्नवादी हाती घेतलेले काम पुरे केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. ही माणसे उत्तम मित्र आणि उत्तम सल्लागार म्हणून प्रसिद्ध पावतात. या व्यक्ती अतिशय भावनाप्रधान असतात. हा दोष यांना खूप त्रासदायक ठरतो. रोज स्वत:चा शोध घ्या. स्वत:ची किंमत वाढवण्यासाठी प्रयत्न करा, कारण तुमच्यातल्या आंतरिक गोष्टी खूप काही घडवू शकतात. तुम्ही तुमच्या विचारातून घडत आहात याची जाणीव ठेवा.
भाग्यांक सात- अशा व्यक्ती संशोधकवृत्तीच्या असतात. गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याचा ठाव घेणे यांना आवडत असते. या लोकांत प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यामुळे येणाऱ्या संकटावर ते सहज मात करू शकतात. साहस आणि निर्भयता या दोन गुणांचा आविष्कार यांच्या मनात सतत वावरत असतो. तत्त्वज्ञान, गूढशास्त्रे, संगीत यांची यांना आवड असते. या गोष्टींत यांचा उत्तम नावलौकिक होतो. उत्तम प्रतिभाशैली यांच्यापाशी असते. तेव्हा यांनी लिखाण करावे. नावलौकिक, प्रतिष्ठा वाढेल. शक्यतो भागीदारीत धंदे करू नये. स्वत:ला कधीही कमी लेखू नये.
भाग्यांक आठ- अबोल, करडी शिस्त व चिकाटी यामुळे यांच्या कर्तृत्वाला एक वेगळीच धार येते. अगदी लहान वयात यांना पैशाची किंमत कळते, त्यामुळे या व्यक्ती शक्यतो पैसा फार जपून वापरतात. न्यायदृष्टीने पाहण्याची वृत्ती, त्यामुळे यांच्यावर जर कोणी अन्याय केला तर ते कदापि सहन करत नाहीत. राजकारणातील डावपेच जाणून राजकारणात आपले स्थान कसे टिकवावे याची यांना उत्तम जाण असते. आपल्या दूरदृष्टीचा उपयोग स्वत:साठी करावा. अति भावविवश होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. भूतकाळातल्या आठवणींवर जगू नका. भविष्यकाळातल्या सकारात्मक घटनांची यादी मनात तयार करा.
भाग्यांक नऊ- या व्यक्ती खूप निर्भय, पण मनाने अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे मनासारखे काही घडले नाही की यांचे मानसिक संतुलन बिघडते. अगदी लहानसहान गोष्टींसाठी संघर्ष करायची यांची तयारी असते. या लबाडी, फसवणूक करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आध्यात्मिक क्षेत्रात यांची उत्तम प्रगती होते. यांनी समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न करावा. बुद्धिमत्ता कशी वापरली जाईल ते पाहावे. कारण आपली योग्यता कधीकधी खूप उशिरा कळते. दुसऱ्याला समजून घेण्यातला आनंद शोधावा.
6:04 PM

Lagnasi Jata.. Vighne Yeti Nana - Marathi Vivah Goshta

लग्नासी जाता.. विघ्ने येती नाना..

मी पदवीधर केव्हा होतोय याची वाट माझे वडील पाहतच होते. भायखळ्याच्या भाजीबाजारातल्या गाळ्यावर बसून मी शक्य तितक्या लवकर चरितार्थाला लागावं, म्हणजे लगेचच माझे दोनाचे चार हात करता येतील, असा वडिलांचा बेत होता. गाळ्यावर बसण्यासाठी पदवीपर्यंतच्या शिक्षणाची खरं तर गरज नव्हती. म्हणून वडील मी मॅट्रिक झाल्यापासून माझ्या मागे लागले होते. पन्नास-साठ वर्षांपूर्वी बहुजन समाजातील मुले फारशी शिकत नसत. तेव्हा वडिलांचंही बरोबरच होतं. पदवीचं सर्टििफकेट हातात पडायच्या आधीच त्यांनी जातीतल्या चार मुलींची स्थळं सुचवली आणि त्यांच्यापकी कुणा तरी एकीची ताबडतोब निवड कर, असे फर्मान सोडलं. त्या मुली मला ज्ञात होत्या. शिक्षण जेमतेम होतं. दिसणं असायलाच पाहिजे असा त्यांचा ग्रह असावा असे काही त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसत नव्हतं. थोडक्यात रूपाच्या बाबतीत आनंदी- आनंदच होता. त्यांच्याशी लग्न लावण्यापेक्षा वानप्रस्थाला जाणं अधिक आनंददायी ठरलं असतं. पण हे सगळे वडिलांना सांगायचं कसं? त्या वेळचे वडील! खरं तर त्यांना बाप हाच शब्द योग्य होता. बला टळावी म्हणून मी वडिलांना म्हटलं, ‘‘मला पोस्ट ग्रॅज्युएट होऊ द्या, मग मी लग्नाला उभा राहीन’’. मला चल रे भोपळ्या टुणूक टुणूक या गोष्टीतल्या म्हातारी वाघाला ‘‘लेकीकडे तूप-रोटी खाऊन जाडजूड होऊन परत येईन तेव्हा तू मला खा’’ म्हणाली होती त्याची आठवण झाली. वडील कबूल झाले. माझे आजचे मरण उद्यावर, खरं तर दोन वर्षांवर ढकललं गेलं होतं.
दोन वर्षांनी मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो. ते समजताच वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता दुसऱ्या चार मुलींची स्थळं सुचवली. या आधीच्या चार मुलींच्या रूपांच्या संदर्भात या मुलींच्या रूपाची उतरती भाजणी होती. नाकीडोळी, सगळं बेतास बेत होतं. वडिलांचा हाही बेत उधळून लावला नाही तर यातल्या एखाद्या कुस्वरूप रूपवतीला आपली सौभाग्यवती करून घ्यायला लागेल या कल्पनेने पोटात गोळा आला. आपण जर त्वरित आपलं सौभाग्य शोधलं नाही तर आपल्या दुर्भाग्याला सीमा राहणार नाही याची जाणीव मला झाली. दुसऱ्या दिवसापासून मी शोध सुरू केला. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींकडे पाहू लागलो, पण एक पंचाईत झाली. कारण मी जरी मुलींकडे आशेने पाहात होतो तरी एकही मुलगी माझ्याकडे पाहात नव्हती. इथे पदार्थ विज्ञानातील नियम आड येत होता. त्या नियमाप्रमाणे काळ्या वस्तूवर प्रकाश पडला तर तो परावर्तित होत नाही. त्यामुळे ती वस्तू दिसत नाही. (हा नियम शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पुढच्या बेचाळीस पिढय़ा ब्रह्मचारी राहतील, अशी ‘संताप-वाणी’ मी त्या वेळी काढल्याचं मला चांगलं आठवतंय.)
आम्ही आपापल्या जन्मदात्यांना निक्षून सांगितलं ‘‘बऱ्या बोलानं आमचं लग्न लावून द्या- नाही तर आम्ही पळून जाऊन लग्न करू.’’ दोन्हीकडची माणसं अब्रूला घाबरली.
वधू शोधणं थोडं कठीणच होऊन बसलं होतं. आजच्याप्रमाणे त्याकाळी कॉलेजातली मुलं-मुली खांद्याला खांदा लावून आणि गळ्यात गळा घालून शिकत नव्हती. त्यामुळे कॉलेजात माझ्या ‘गळाला’ कुणी लागलं नव्हतं. बरं, आजच्या प्रमाणात गल्लोगल्ली ‘नवसाला पावणारे’ गणपतीही नव्हते. त्यामुळे नवस तरी कोणाला बोलावा आणि आपल्या लग्नातील हे ‘विघ्न’ कुठल्या विघ्नहर्त्यांला सांगावं याचा प्रश्न पडला. पण ज्याचा कोणी वाली नसतो, त्याचा वाली देव असतो असं म्हणतात, त्याप्रमाणे माझ्या मदतीला देव नाही तर, ‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय’ अशी ‘वाणी’ उच्चारणारी आकाशवाणी आली (देवाच्या या नाकर्तेपणामुळेच मी तेव्हापासून नास्तिक झालो) मी तेव्हा युवा-वाणीमध्ये कथा-कविता सादर करायचो. तिथे तेव्हा प्रसिद्ध लेखक रवींद्र पिंगे होते. नेमकी त्याच वेळेला एक निमकाळी मुलगी आपल्या कविता सादर करायला यायची. ती अर्धी काळी अन् अर्धी गोरी असल्यामुळे पदार्थ विज्ञान शास्त्राचा नियम झुगारून दिसायची. मी ‘गळ’ टाकायचं ठरवलं. रेकॉर्डिग संपल्यावर मुद्दाम भेटायचो. तिच्या कविताचं ‘उदे गं अंबाबाई’ म्हणून भरपूर उदोउदो करायचो. पुरुषांच्या खोटय़ा स्तुतीला न भुलणारी एक तरी स्त्री जगात आहे काय? माझी भूलथाप फळाला आली. मासा गळाला लागला.
मी वडिलांसमोर मोठय़ा ऐटीत जाऊन उभा राहिलो आणि म्हणालो,
‘‘तुम्ही माझ्यासाठी मुलगी पाहू नका. मी मुलगी पसंत केलीय’’.
‘‘अरे वा उत्तम - शेवटी गंगेत घोडं न्हालं म्हणायचं.’’ वडिलांच्या चेहऱ्यावर ‘गंगास्नान’ केल्याचा आनंद दिसत होता.
‘‘काय - नाव मुलींच्याकडचं - म्हणजे आडनाव?’’
‘‘खांबेकर’’.
‘‘खांबेकर? पण हे असलं नाव आपल्या जातीत नसतं’’
’‘कसं असेल? ती आपल्या जातीची नाहीए’’
‘‘मग कोणत्या जातीची?’’
‘‘शिंपी’’
‘‘शिंपीऽ?’’ वडील अंगावर विंचू पडल्यासारखे ओरडले.
‘शिंपी’ जातीच्या नावाला जरा भारदस्तपणा यावा म्हणून मी म्हणालो,
‘‘म्हणजे कोकणस्थ नामदेव शिंपी’’
कोकणस्थ ब्राह्मण स्वत:ची जात सांगताना ज्या फुशारकीनं सांगतात, काहीशी तीच फुशारकी माझ्या स्वरात होती, पण माझी ही फुशारकी कुचकामी ठरली.
वडील दात-ओठ खात म्हणाले,
‘‘एवढा शिकलास - पण तुला काही अक्कल? आपण ‘माळी’ ते ‘शिंपी’. आपण कुठं? ते कुठं??’’
‘माळी’ नेमके कुठे आणि ‘शिंपी’ कुठे हे काही मला केल्या कळेना. मी वडिलांकडे अडाण्यासारखं पाहात राहिलो. पण वडिलांनी माझा ‘अडाणीपणा’ तात्काळ दूर केला, म्हणाले -
‘‘अरे, आपण माळी म्हणजे श्रेष्ठ - ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ’’
‘माळी’ जात ही सर्व जातींत श्रेष्ठ हे ज्ञान मला नव्यानंच प्राप्त झालं होतं. नक्की श्रेष्ठ कशी हे समजावं म्हणून मी तीर्थरूपांना विचारलं,
‘‘आपली जात श्रेष्ठ कशी?’’ एवढं बोलून मी तोंडावर बोट ठेवलं.
‘‘अरे बावळटा, आपण माळी फुलं पिकवतो - तेव्हा ना ते ब्राह्मण देवाची पूजा करतात? आपण फुलंच पिकवली नाही तर कसली पूजा - अन् कसले ब्राह्मण?’’
मला त्या वेळच्या माझ्या ज्ञानाच्या पातळीप्रमाणे वडिलांचं म्हणणं तंतोतंत पटलं. दुसऱ्या दिवशी मी माझ्या भावी पत्नीला म्हणालो,
‘‘आपलं लग्न जमणं शक्य नाही’’
‘‘का?’’
‘‘वडील म्हणतात, माळी शिंप्यापेक्षाच काय पण ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ आहे.’’ मी वडिलांचं संशोधन तिच्या कानावर घातलं ते फूलं-पूजा, वगैरे वगैरे.
या भेटीनंतर दोन दिवसांनी वाग्दत्त वधूचा ऑफिसात फोन आला,
‘‘संध्याकाळी ‘दादर’ला भेटा. महत्त्वाचा निरोप सांगायचाय.’’ संध्याकाळी आम्ही दोघं एका निवांत हॉटेलात भेटलो.
‘‘तुझ्या वडिलांचं म्हणणं मी माझ्या वडिलांना सांगितलं.’’
‘‘मग? पटलं असेल त्यांना?’’
‘‘नाही, अजिबात नाही. मला ते म्हणाले, त्याच्या वडिलांना जाऊन सांग, आम्ही शिंपी- आम्ही जर कपडेच शिवले नाही तर-तुम्ही माळी आणि ब्राह्मणच काय तुमचे देवही दिगंबर अवस्थेत तोंड लपवून बसाल. मग कसली फुलं, कसली पूजा, कसले माळी आणि कसले ब्राह्मण?’’
आमची दोघांचीही अवस्था द. मा. मिरासदारांच्या कथेतल्या त्या दोन्ही बाजूंकडून थपडा खाणाऱ्या शाळकरी पोरासारखी झाली. त्याच्या बापाचं मत होतं की, शिवाजी महाराज निरक्षर होते, तर त्याच्या इतिहास शिकवणाऱ्या शिक्षकाचं मत होतं की, महाराज साक्षर होते. त्या दोघांच्या परस्परविरोधी मतांच्या निरोपाची देवाणघेवाण करताना त्या पोराला दोन्हीकडून थपडा खाव्या लागतात. आम्हाला थपडा खायच्या नव्हत्या. आम्ही आपापल्या जन्मदात्यांना निक्षून सांगितलं, ‘‘बऱ्या बोलानं आमचं लग्न लावून द्या- नाही तर आम्ही पळून जाऊन लग्न करू.’’ दोन्हीकडची माणसं अब्रूला घाबरली. लग्नाला तयार झाली, पण भावी सासऱ्यानं अट घातली की, पत्रिका जुळल्या पाहिजेत. वडिलांनी पत्रिका पाठवली. उलट पावली निरोप आला, पत्रिकेत मुलाला मंगळ आहे. हे लग्न झाल्यास मुलीला वैधव्य योग संभवतो. तो भोग आम्हाला नको. सहा महिन्यांच्या आत मुलाला देवाज्ञा होईल या लग्नामुळे.’’
माझ्या भावी पत्नीचं तोंड चिमणीएवढं झालं. मी गमतीने तिला म्हणालो, चांगलं आहे की सहा महिन्यांत तुला दुसरा चान्स. मग मी तिची समजूत काढली. म्हटलं, त्या मंगळाला काही उद्योग नाही का, त्या नवग्रहात फिरायचं सोडून तो कशाला माझ्या पत्रिकेत येऊन बसेल. कुठल्याही ग्रहाचा मानवी आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही. आधुनिक विज्ञानाने ते सिद्ध केले आहे. भृगू ऋषी पावले. तिची समजूत पटली. मग पुन्हा एकदा आम्ही आपापल्या पिताश्रींना तोंडीच फायनल नोटीस दिली. जर दोन महिन्यांच्या आत तुम्ही आम्हाला बोहल्यावर उभं केलं नाही, तर मॅरेज रजिस्ट्रारच्या दारात उभं राहण्यात येईल. नोटीस लागू पडली. दोन्हीकडच्या लोकांना मिरवण्याची संधी घालवायची नव्हती. लग्न थाटामाटात झाले. चाळीस वर्षे सुखाचा संसार झाला. लग्नानंतर सहा महिन्यांत येणारी देवाची आज्ञा आली नाही. उजाडल्यापासून घरच्या देवीच्या आज्ञा मात्र पाळत बसावं लागतं. सूर्यास्तानंतर मात्र माझीच आज्ञा चालते.
6:03 PM

Lagnache Vay

लग्नाची वेगळी गोष्ट - लग्नाचे वय

चार वर्षांपूर्वी गिरगावातल्या त्या चाळीच्या जागी जाण्याचा योग आला. ४० वर्षांपूर्वी या चाळीच्या जागेशी माझी ओळख झाली होती. आज या ठिकाणी पाच-सहा मजल्यांची भव्य इमारत उभी आहे, पण पूर्वी येथे चाळ होती. मुंबईला बदली होऊन आल्यावर दोन-तीन वर्षे मी त्या चाळीत पेइंग गेस्ट म्हणून राहिलो होतो. त्या चाळीत कोकणातल्या आमच्या भागातीलच माणसे राहायची. त्यांच्याकडून अधूनमधून ख्यालीखुशाली कळायची. चार वर्षांपूर्वी एका नातेवाईकाकडे गेलो होतो, तर बंडूकाका निवर्तल्याचे कळले आणि सगळा कालपटच एखाद्या चित्रपटाप्रमाणे समोर उभा राहिला.
बंडूकाका वयाच्या १३-१४व्या वर्षी मुंबईला आले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नोकरीला लागले. त्या चाळीत पेइंग गेस्ट म्हणून राहिले. वयाची चाळिशी उलटली तरीही त्यांचे लग्न झाले नव्हते. कोकणातील घरच्या मंडळींची जबाबदारी, दोन लहान भावांच्या शिक्षणाची व बहिणीच्या लग्नाची जबाबदारी त्यांच्यावर होती. या जबाबदारीतून मुक्त झाले, तर लग्नाचे वय उलटून गेलेले. काही थोराड मुलींच्या पत्रिका त्यांच्याकडे आल्या, काहींनी विधवा विवाह करण्याचाही सल्ला दिला, पण बंडूकाकांनी लग्न करण्याचा विचारच सोडून दिलेला होता.
बंडूकाकांनी नोकरी करता करता पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. नोकरीतही बढती मिळाली होती. वागणे, बोलणे मर्यादाशील; सरळ-साधी वागणूक, विनयी व दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती, दिसायला नीटस, निरोगी शरीर, स्त्री वर्गाशी आदराची व मर्यादा ठेवून वागण्याची पद्धत. एक सभ्य, सुसंस्कृत व्यक्ती असूनही त्यांचा विवाह का होऊ शकला नाही?
काकांची जन्मपत्रिका पाहणाऱ्या एका ज्योतिषाने स्पष्टपणे सांगितले होते की, ‘अजून कमीत कमी २० वर्षे काकांना लग्नयोग नाही. यांचे लग्न त्यांची पंचेचाळिशी उलटल्यानंतर अगदी अनपेक्षितपणे होईल. एक सुस्वभावी, सुंदर अशी तरुण मुलगी आपणहून यांच्या आयुष्यात येणार आहे.’ अनेकांनी त्या ज्योतिष्याची टिंगल करायला सुरुवात केली. त्या वेळी भविष्य लिहिलेला कागदच त्यांनी दिला. त्या कागदावर नोट लिहिली की, हा कागद जपून ठेवा. काकांचे लग्न होईल, त्या वेळी मी हयात असणार नाही, पण लग्नाच्या वेळी या कुडमुडय़ा ज्योतिष्याची तुम्हाला नक्की आठवण होईल. कित्येक वर्षे याची चर्चा सुरू राहिली व ती मुला-मुलींच्या कानावरही पडत असे.
बंडूकाकांना ‘सार्वजनिक काका’ असे गमतीने म्हटले जायचे. सरळ व सुस्वभावी बंडूकाका अडल्यानडल्या वेळी सर्वाच्या मदतीला धावून जायचे. भायखळ्याला जाऊन घाऊक दरात भाजीपाला आणून तो चाळकऱ्यांमध्ये वितरित करणे, वाणसामानाचे वितरण करणे, निरनिराळे उत्सव, दिवाळीचे आकाशकंदील करणे यात त्यांचा पुढाकार असायचाच, पण लहान मुलामुलींमध्ये ते फार रमायचे. मुलांचा अभ्यास घे. त्यांना गोष्टी सांग. परवचा म्हणून घे, त्यांच्या सहली काढ. थोडक्यात, मुलांना जे जे प्रिय अशा गोष्टींमध्ये ते रमून जायचे. अशाच मुलामुलींमध्ये अंजली नावाची मुलगी होती. अगदी लहानपणापासून ती काकांच्या मेळाव्यात दाखल झालेली होती.
अंजली बी.कॉम. होऊन बँकेत नोकरीला लागली. दोन वर्षांनी तिच्या लग्नाच्या खटपटी सुरू झाल्या. चांगली चांगली स्थळे ती नाकारू लागली. तिच्या मनात काय आहे, तिचे कुठे प्रेमप्रकरण आहे का? असे नाना विचार घरच्यांच्या मनात घोळू लागले. तशी तिच्याकडे विचारणाही झाली, पण तिचे उत्तर ठरलेले असे, ‘मला आता लग्न करायचे नाही. जेव्हा लग्न करावेसे वाटेल तेव्हा मी आपणहून सांगेन, पण एक नक्की की, जी व्यक्ती मला पसंत पडेल, त्या व्यक्तीचा जर होकार असेल तर त्याच्याशीच मी लग्न करीन. आणि असं जर घडलं नाही, तर मी आजन्म कुमारिका राहीन, पण घरच्यांना माझे ओझे वाटणार नाही याची काळजी घेईन.’
सर्वाचीच बोलती बंद झाली, पण काळजी मात्र वाढली. तिच्या या निर्णयामुळे तिच्या आईवडिलांना नेमके काय करावे, हे सुचत नव्हते. या मुलीला लग्नाचा तगादा लावला आणि तिने काही बरेवाईट करून घेतले तर? बंडूकाकांची भेट घेऊन त्यांनी अंजलीला समजावून सांगावे अशी गळ त्यांनी घातली. बंडूकाकाही विचारात पडले, पण ‘मी पाहतो प्रयत्न करून’ असे मोघम उत्तर त्यांनी दिले. पण तिच्या आई-वडिलांना स्पष्ट कल्पना दिली की, या बाबतीत इथे तिच्याशी बोलणे अवघड होईल. आम्ही चौपाटीवर जाऊन बोललो तर चालणार असेल, तर मी बोलू शकेन.
तिच्या आई-वडिलांचा होकार मिळाला.
रविवारची सकाळ उजाडली. अंजलीला पाहिल्यावर बंडूकाका तिला म्हणाले, ‘आज संध्याकाळी एक-दोन तासांचा मोकळा वेळ तुला असेल, तर मला काही सांगायचेय व त्यासाठी आपण चौपाटीवर जाऊ.’
थोडासा विचार करून अंजलीने होकार दिला.
रविवारी संध्याकाळी बंडूकाका व अंजली चौपाटीवर गेली. भेळ खाता-खाता इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अंजली म्हणाली, ‘काका, मी लग्न करावे हे मला पटविण्यासाठीच मला तुम्ही इथे बोलावलेत ना?’
‘हो. अगदी बरोबर, तुला जर कसली भीती वाटत असेल, कुणी तरुण मनात भरला असेल, तू त्याच्याशी लग्न करू इच्छित असशील, तर स्पष्टपणे सांग. तुला समजून घेण्याचा मी प्रयत्न करीन,’ बंडूकाका म्हणाले.
‘काका, आत्तापर्यंत मी कधीच, बेजबाबदारपणे वागलेली नाही, याची तुम्हालाही माहिती आहे. मी आता स्वतंत्रपणे विचार करू शकते. योग्य जोडीदार म्हणजे कोण? त्याचा वयाशी संबंध असलाच पाहिजे का? काही दिवसांत झालेल्या ओळखीने लग्नासाठी दिलेला होकार वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी नेहमीच योग्य ठरतो का? त्यापेक्षा ज्या व्यक्तीला आपण बरीच वर्षे ओळखतो, ज्याचा स्वभाव, वागण्याची पद्धत आपल्याला निश्चितपणे माहिती आहे, अशी व्यक्ती लग्नाचे वय उलटून गेलेली असली तरी एखाद्या तरुणीला आयुष्याचा जोडीदार म्हणून ती व्यक्ती अयोग्य वाटली नाही, तर ते चूक ठरेल काय?’
अंजलीने आपला मनोदय व्यक्त केला.
थोडा वेळ स्तब्ध राहून बंडूकाका म्हणाले, ‘तुझे बोलणे सर्वस्वी चुकीचे आहे, असे जरी म्हणता आले नाही, तरी लोकरीतीला ते धरून होणार नाही. विजोड लग्न फार काळ टिकू शकेल असेही सांगता येत नाही. शिवाय अशा लग्नव्यवहारातून कटुता, गैरसमज, असमाधान निर्माण होण्याचीच शक्यता अधिक असते. कारणपरत्वे, प्रौढ विवाह, विजोड विवाह, विधवा विवाहही होतात, पण ते गरजेपोटी. आजकालच्या जमान्यात योग्य वेळी तरुण-तरुणींनी विवाह करणे हे सर्वमान्य आहे व ते योग्यही ठरते. दुसरे असे की, तुमच्यासारख्या मुलींना नाही म्हटले तरी पूर्वीपेक्षा स्वातंत्र्यही अधिक आहे. शाळा-कॉलेजात जाताना, नोकरी करताना तरुण-तरुणींना एकत्रपणे वावरण्याची संधीही मिळते. एकत्रितपणे वावरल्यामुळे परस्पर ओळख वाढते. यातूनच प्रेमविवाह, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहही होतात. बदलत्या परिस्थितीनुसार त्यात काही गैर आहे, असेही नव्हे. पण अनेक वेळा बाह्य़ स्वरूपावरून प्रेमसंबंध जुळतात. कधी अनुमतीने, कधी पळून जाऊनही लग्ने होतात. नवलाईचे नऊ दिवस संपले, एक मूल झाले की खऱ्या संसाराला सुरुवात होते आणि येथून कसोटीच्या क्षणांचीही सुरुवात होते. स्वभाव जुळत नसेल, बारीकसारीक कारणांवरून मतभिन्नता झाली की भांडणांना सुरुवात होते. भांडय़ाला भांडे लागून आवाज येतो, हे जरी खरे असले तरी, सततच्या भांडय़ांच्या आवाजाने भांडणे होणे केव्हाही अहितकारकच. आपल्या संस्कृतीत पत्रिका पाहून, घराणे पाहून जे पारंपरिक पद्धतीने विवाह होतात ते बऱ्याचशा प्रमाणात टिकतात, असा आजवरचा अनुभव आहे, त्यामुळे तू तुझा विचार करून आई-वडिलांच्या इच्छेलाही मान देऊ शकतेस. तुला अनुरूप असा कोणी भेटला असेल व त्याच्याशीच तुला विवाह करायचा असेल, तर तसे स्पष्ट सांग. मला सांगितलेस, तरी मीही प्रयत्न करीन. पण याबाबतही तुझा काही दुराग्रह असेल तर तो सोडून दे.’
‘काका, मी दुराग्रही नाही. सुस्वभावी, माहितीतल्या पुरुषाशी विवाह होणे हे तुम्ही मान्य करता. संसार सुखाचा व्हायचा असेल तर मने जुळावी लागतात, हे तुम्हालाही पटते. पण जोडीदार हा लग्नाच्या वयाचा राहिला नसेल, तर त्याच्याशी विवाह करणे मान्य करण्यासारखे आहे, हे तुम्हाला मनापासून पटले, तर तुम्ही ते उघडपणे बोलून दाखविणार नाही. कारण तुम्ही पारंपरिकतेला जपू इच्छिता, लोकापवादाला तुम्ही घाबरता, असे मी म्हटले तर?’ अंजली म्हणाली.
योग्य जोडीदार म्हणजे कोण? त्याचा वयाशी संबंध असलाच पाहिजे का? काही दिवसांत झालेल्या ओळखीने लग्नासाठी दिलेला होकार वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी नेहमीच योग्य ठरतो का?
‘वादासाठी तुझा मुद्दा मी एक वेळ मान्य करतोही, पण तुझ्या मनात खरोखरच असा कोणी पुरुष भरला असेल, तर तो विचार सोडून दे. अगं, ज्या पुरुषाचे अर्धेअधिक आयुष्य संपले आहे अशा पुरुषाशी विवाह करण्याची इच्छा करण्यापेक्षा तू एखादा तरुण जोडीदार निवडणे अधिक श्रेयस्कर नाही का? जाणूनबुजून अध्र्या संसाराची अपेक्षा तू का करतेस?’ काका म्हणाले.
‘काका, एखाद्याचे योग्य वयात लग्न न होणे, हा त्या व्यक्तीचा दोष असू शकतो का? लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असतील. एखाद्याचा विवाह होणे-न होणे, तो कोणाशी व कधी होणे, संसारसुख मिळणे न मिळणे या गोष्टी जर नियती ठरवीत असेल व ते बहुतेक वेळा मान्यही करावे लागते, असे जर असेल तर वयाचा मुद्दाच केवळ का विचारात घ्यावा?’ अंजली म्हणाली.
‘तरीही तू असला विचार सोडावास असे मला वाटते.’ काका म्हणाले.
दोन-तीन मिनिटे स्तब्धतेत गेली.
अंजली पुढे म्हणाली-
‘काका, लहानपणापासून मी तुम्हाला पाहतेय. तुम्ही मला कळायला लागलेत त्यालाही आता आठ वर्षे झाली. सज्जनाचे सगळे गुण अंगी असूनही व निरोगी शरीराबरोबरच प्रसन्न चेहरा मिळूनही तुमचा विवाह अद्याप का झाला नाही?’
‘अगं, लग्नाचे एक वय असते, त्या वयात माझ्यावर काही जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे माझ्या लग्नाचा विचार मी केला नाही. नंतर मुली सांगून आल्या, पण नाही जमले. गेली ३५ वर्षे या चाळीतच मी पेइंग गेस्ट म्हणून राहतोय. लग्न करून संसार करायचा म्हणजे स्वत:ची जागा नको का? शिवाय, आमच्या ज्योतिषी काकांनीच सांगितले होते. लग्नयोग चाळिशीनंतर आहेत.’ काका सांगत होते.
अंजली म्हणाली, ‘ज्योतिषीकाकांनी ‘चाळिशीनंतर लग्न होईल’ इतकेच सांगितले होते? मला माहीत आहे सारी हकीगत. आमच्या घरीच ऐकली होती ती मी. ज्योतिषीकाकांनी असेही लिहून दिले आहे की, तुमचा विवाह एका सुंदर, सुस्वभावी मुलीशी होईल म्हणून.’
‘खरे आहे ते, पण नेहमीच ज्योतिष खरे होते काय?’ काका म्हणाले.
‘जर, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, लग्न ही योगायोगाची गोष्ट आहे, यावर तुमचा विश्वास आहे, तर ज्योतिषाने छातीठोकपणे लिहून दिलेल्या भविष्यावर तुमचा विश्वास असायला पाहिजे,’ अंजली बोलत होती.
काका स्तब्ध राहिले.
‘काका, आज तुम्ही माझी समजूत घालण्यासाठी, मी विवाह करावा, हे सांगण्यासाठी इथे मला आणले आहे, तर माझा निर्णय मी तुम्हाला सांगते. तुम्ही त्याच्यावर जरूर विचार करा,’ अंजली म्हणाली.
‘कोणता निर्णय?’ काकांनी विचारले.
‘काका, मला तुमच्याशी लग्न करायचेय..’ अंजली म्हणाली.
अंजलीचा निर्णय ऐकून काका तर सर्दच झाले. काय बोलावे हे सुचेनासे झाले. हिच्या वडिलांनी, ती लग्नाला तयार व्हावी म्हणून मला तिच्याशी बोलायला, समजूत काढायला सांगितले. ती लग्नाला तयार झाली आहे, पण तिचा निर्णय किती विचित्र आहे. हा निर्णय त्यांना मी कसा सांगू? त्यांचा माझ्याविषयी काय ग्रह होईल? चाळकरी काय म्हणतील? इतक्या वर्षांपासून सांभाळलेली इभ्रत एका क्षणात धुळीला नाही का मिळणार? अनेक प्रश्नांचे काहूर काकांच्या मनात दाटून आले.
‘काका बोलत का नाही?’ अंजली म्हणाली.
‘काय बोलू? अगं, धर्मसंकटात टाकलेयस तू मला. तुझ्या आई-वडिलांच्या इच्छेप्रमाणे तू लग्न करायला तयार झाली आहेस, ही आनंदाची बातमी त्यांच्या कानावर मला घालायची होती, पण झाले भलतेच. कोणत्या तोंडाने तुझा निर्णय मी त्यांच्या कानावर घालू?’ काका म्हणाले.
‘काका, निर्णय तुम्ही नाही, मीच त्यांच्या कानावर घालीन.’ अंजली.
‘अगं, असा वेडेपणा करू नकोस, माझ्याविषयी गैरसमज होईल, असे काही करू नकोस.’ काका.
‘काका, मी तुम्हाला पसंत नसेन, तुमचा संसार मी करू शकणार नाही, असे तुम्हाला मनापासून वाटत असेल तर काही हरकत नाही. मी तसे वागणार नाही. पण मी पक्के ठरवलेय की, लग्न तुमच्याशीच करायचे, नाही तर आजन्म मी कुमारी राहीन. अर्थात माझ्या घरी हा निर्णय पटणार नाही. त्यामुळे वेळच आली तर मी घर सोडेन. लीव्ह लायसन्सवर जागा शोधीन व तेथे राहीन, पण माझ्या निर्णयात मी बदल करणार नाही.’ अंजली म्हणाली.
काका निरुत्तर झाले. काय बोलावे त्यांना कळत नव्हते. जन्मभर अविवाहित राहण्याचा त्यांचा ‘पण’ नव्हता. जमले तर त्यांनाही संसार थाटायचा होता, पण ही जर-तरची भाषा होती. आज एक तरुण, सुस्वरूप, सुस्वभावी मुलगी आपणहून त्यांच्याशी विवाह करू इच्छित होती. अंजली असा काही निर्णय घेईल हे स्वप्नातही त्यांच्या कधी आले नव्हते. अंजली त्यांना प्रिय होती, पण ती आपली पत्नी व्हावी, असा विचारही त्यांच्या मनात कधी डोकावला नाही. नाही म्हटले तरी, लोकापवादाचीही भीती होतीच. त्याहीपेक्षा एका तरुणीने एका प्रौढाशी लग्न करणे त्यांना मान्य नव्हते. पण याच वेळी ज्योतिषीकाकांचे भविष्यही त्यांना खुणावत होते. ते जर खरे होणार असेल तर? तर आपल्याला लग्न करावेच लागेल. काय करावे? अंजलीचा निर्णय मी काही तिच्या आई-वडिलांच्या कानावर घालू शकणार नाही, असे काकांना वाटत होते.
‘काका इतके गोंधळून जाऊ नका. माझा निर्णय मी स्वत:च आई-वडिलांच्या कानावर घालते. तुम्ही टेन्शन घेऊ नका.’
अंजलीचे मन वळविण्यात काका अयशस्वी ठरले होते. एका अपराधीपणाच्या भावनेने ते चालू लागले. अंजलीही पाठोपाठ चालत होती. काका चालत होते. घरी पोहोचल्यावर काय उत्तर द्यायचे, याचा विचार करीत. तर अंजली चालत होती आपला निर्णय कळविण्याच्या विचाराने. अंजली परिणामांची काळजी करीत नव्हती; काका परिणामांचा विचार करीत चालले होते.
दोघेही चाळीपर्यंत पोहोचल्यावर काका न बोलता आपल्या रूमवर गेले. अंजली आपल्या घरात गेली. ‘अंजली काय झाले?’ आई-वडिलांनी अधीरतेने विचारले. ‘सांगेन उद्या सकाळी.’ तोपर्यंत वाट पाहण्याचा आई-वडिलांना धीर नव्हता. ते काकांच्या खोलीवर आले. काकांचा काळजीयुक्त चेहरा पाहून काही फलित निघाल्याचे दिसत नाही, असे त्यांना वाटले.
‘काका गप्प का? काय बोलणे झाले?’
आई-वडिलांनी विचारले.
‘बोलणे झाले, पण अंजलीचा निर्णय माझ्या तोंडून सांगणे मला जमणार नाही. माझी अपराध्यासारखी भावना झाली आहे. मी तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही. अंजलीच्याच तोंडून ऐका’ काका म्हणाले.
आता दुसरा दिवस उजाडण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. दिवस उजाडला. सकाळची लगबग संपली. बँकेत जाण्यासाठी अंजली तयार झाली. टिफिन बॉक्स हातात देता देता आईने तिला विचारले, ‘तू निर्णय घेतला आहेस म्हणे. काय निर्णय घेतलायस?’
‘मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय’ अंजली.
‘व्वा, देव पावला म्हणायचा’ आई.
‘मी काकांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय’ अंजली.
इतके बोलून अंजली घराबाहेर पडली. तिच्या आईचा तिच्या कानांवर विश्वास बसेना. काय जगावेगळा निर्णय केलाय पोरीने!! आईची अशी अवस्था झाली. वडिलांना ते कळले. आता पुढे काय? अनुत्तरित प्रश्नाचा विचार करण्यातच दिवस निघून गेला.
संध्याकाळी अंजली घरी आली. कोणीच काही बोलले नाही. रात्री आई-बाबांनी अंजलीला सांगितले, ‘किती विचित्र निर्णय घेतलायस तू. काकांनाही धर्मसंकटात टाकलेयस. फेरविचार कर.’
‘आई, बाबा, पूर्ण विचार करूनच मी निर्णय घेतलाय. मी काकांशीच लग्न करीन, नाही तर मी आजन्म कुमारिका राहीन. माझा निर्णय तुम्हाला मान्य होणार नाही. माझा आग्रह नाही तुम्ही तो मान्य करावा. तुम्हाला दुखवावे म्हणून मी निर्णय घेतलेला नाही. जगावेगळे काही करून दाखवायचे म्हणूनही हा निर्णय नाही. वाढलेले वय हा मुद्दा सोडला तर काकांच्यात काय वैगुण्य आहे. सगळ्यांसाठी झटणाऱ्या काकांचे एकाकी जीवन मला बदलायचेय. मला काकांचा संसार करायचाय म्हणून हा निर्णय आहे. माझ्या या निर्णयामुळे तुम्ही व्यथित व्हाल, याची मला कल्पना आहे, तरीही या निर्णयापासून परावृत्त व्हावे, असे मला वाटत नाही. मी माझा निर्णय तुम्हावर व काकांवर लादू इच्छित नाही, पण एक नक्की, मीसुद्धा काकांसारखेच एकाकी आयुष्य जगेन. माझी मी स्वतंत्रही राहीन.’ अंजली निश्चयपूर्वक बोलत होती.
अंजलीच्या या विचित्र निर्णयाने काकाही बेचैन झाले होते. अंजली त्यांना आवडत होती, पण ती एक सद्गुणी मुलगी म्हणून. तिचा पत्नी या नात्याने ते कधी विचारच करू शकत नव्हते. तसे त्यांच्या मनातही नव्हते, पण अगदी अनपेक्षितपणे अंजलीने प्रश्नचिन्ह उभे केले होते. उपाय एकच होता, महिन्याभराची रजा घेऊन कोकणात गावी जाऊन राहायचे व तेथून आल्यावर लीव्ह लायसन्सची जागा पाहून या चाळीपासून दूर जायचे. या उपायामुळे तरी अंजलीचा विचार बदलणार होता का? सुतराम शक्यता नव्हती.
काका एक-दोन दिवसांतच गावी निघून गेले, तरी चाळीत चर्चा सुरू झाली. अंजलीला व काकांना चाळीतील सर्व ओळखून होते. या विचित्र परिस्थितीत आक्रस्ताळेपणा करून चालणार नव्हता. संयमाने मार्ग काढायला हवा होता.
एक महिनाभर चाळीतले वातावरण उदासीनतेचेच होते. त्या चाळीतील सर्व चाळकरी एकमेकांना विचारणारे होते. अंजलीचा निर्णय तिचा व्यक्तिगत खरा, पण यामुळे दोन कुटुंबांत जे वातावरण तयार झाले, ते कोणाला रुचण्यासारखे नव्हते. यातून काही तरी मार्ग काढायलाच पाहिजे. अंजली काय किंवा काका काय, दोघांविषयी चाळकऱ्यांच्या मनात आपुलकीचीच भावना होती. रोज रात्री चाळकरी एकत्र जमून याच विषयावर चर्चा करीत. सर्वानुमते अंजलीच्या घरच्यांची समजूत काढायचे ठरले. ‘वय’ हा मुद्दा सोडल्यास काकांबद्दल त्यांचा कोणताही आक्षेप नव्हता. सरतेशेवटी अंजलीचे आई-वडील लग्न लावून द्यायला नाखुशीने का होईना, पण तयार झाले. आता काकांचे मन वळवून त्याचा होकार घेणे आवश्यक होते.
महिन्याची रजा संपल्यावर काका गावाहून परतले. चाळीतले वातावरण काय असेल, याचे दडपण होते. इतकी वर्षे ज्या आजींकडे ते पेइंग गेस्ट म्हणून राहत होते, त्या आजींना त्यांनी सांगितले, ‘आजी, आजपर्यंत घरच्यासारखा मी येथे राहिलो, पण अंजलीच्या विचित्र निर्णयामुळे मी आता येथे राहणे बरे होणार नाही. सांगायला मला अतिशय दु:ख होतेय, पण अशा परिस्थितीत मी चाळच नव्हे, तर मुंबईतला मुक्कामही हलवायचे ठरवलेय. मी कल्याणच्या बाजूला लीव्ह लायसन्सची जागा बघितली आहे. ती लवकरच ताब्यात येईल. मी लवकरच तिथे जाईन.’
‘काका, जागा शोधलीस, तर घाई नको. या चाळीतच तुला जागा मिळेल’ आजी म्हणाल्या.
‘पण आजी, मी कोणत्या कारणासाठी या निर्णयाप्रत आलो, हे तर लक्षात घ्या’ काका म्हणाले.
आजी म्हणाल्या, ‘काका, मी काय म्हणते याचा जरा शांतपणे विचार कर. लग्न करायचेच नाही असा तुझा ‘पण’ नाही. वाढत्या वयाचा विचार करून केवळ मन मारून तू असा विचार करतोयस. नियतीच्याच मनात तुझे लग्न अंजलीशीच होणार असेल, तर तू काय करणार? जरा तुझे ज्योतिष उघडून बघ. हे लग्न लावून द्यायला चाळकऱ्यांनी अंजलीच्या आई-वडिलांना राजी केलेय. तूही आता जरा व्यावहारिक निर्णय घे. स्वत:ला घोडनवरा समजू नकोस. अशा प्रकारची लग्ने पूर्वी सर्रास व्हायची. अंजलीकडे पत्नी या नजरेने तू कधी पाहिलेले नसल्याने तुला अपराधी वाटत असेल, पण जे घडणार आहे ते भल्यासाठीच असेल. हा विचार करून होकार दे. आढेवेढे घेऊ नकोस. तुझ्या नातेवाईकांना सर्व सांगून त्यांना राजी करायची जबाबदारी आमची चाळकऱ्यांची.’
हो-ना करता अखेर काकाही लग्नाला तयार झाले. गिरगावातल्या एका छोटय़ा हॉलमध्ये काकांचा व अंजलीचा विवाह संपन्न झाला. चाळीच्याच बाजूला त्यांनी लीव्ह लायसन्सने जागा घेतली. काकांचा-अंजलीचा संसार सुरू झाला. दोघांच्याही नोकऱ्या सुरळीत सुरू होत्या. काकांनी बँकेकडून लोन घेऊन दोन-तीन वर्षांनी एक मोठा फ्लॅट घेतला. काकांचे बिऱ्हाड नव्याने थाटले गेले.
अशीच काही वर्षे निघून गेली. काकांना मुलगाही झाला. सर्वसाधारणत: संसारात ज्या काही कडू-गोड घटना घडतात त्या त्यांच्याही संसारात घडल्या.
बोलता बोलता दहा वर्षे निघून गेली. काकांनी अठ्ठावन्न वर्षे पूर्ण केली. नियत वयोमानानुसार ते निवृत्त झाले. एक दिवस शांतपणे बसले असताना गेल्या बारा-तेरा वर्षांतील घटना त्यांच्या डोळ्यांपुढे तरळू लागल्या. अंजलीच्या निर्णयामुळे व चाळकरी, अंजलीचे आई-वडील यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे आपण संसारात पडलो. मी बरोबर वागलो की चुकीचे? मी वागलो ते बरोबरही नव्हते वा चुकीचेही नव्हते. जे काय घडले, ते नियतीने घडविले. आणि जे घडले ते चांगलेच घडले. आपल्या लग्नाची ही एक वेगळीच गोष्ट आहे. पण या वेगळ्या गोष्टीनेच आपले आयुष्य पार बदलून टाकले.
काकांना रिटायर्ड होऊनही आता बारा वर्षे झाली. वयाची सत्तरी उलटल्यावर काका एके दिवशी आजारी पडले. अंजलीने उत्तम प्रकारे त्यांची सेवा केली. एके दिवशी काकांनी सर्वाचा निरोप घेतला. अंजली डगमगली नाही. आपल्या मुलाला तिने उत्तम शिक्षण दिले. कालांतराने मुलाचे लग्न झाले. सून घरात आली.
एका वेगळ्या लग्नाची ही वेगळी गोष्ट.
6:02 PM

चारचौघींसारखी वेगळी! Lagnachi Vegali Goshta

चारचौघींसारखी वेगळी!


माझ्या मोठय़ा बहिणीचं लग्न होतं ना होतं तोच आई-बाबांनी माझ्याही लग्नाची मोहीम हाती घेतली. तसं पाहिलं तर माझ्या लग्नाचा विचार ताईच्या लग्नापर्यंत कुणाच्याच मनात आला नव्हता. सव्वीस वषार्र्ची झाले तरीही मी सगळय़ांमध्ये लहान, त्यामुळे लाडावलेलीच होते. मी लग्नाच्या योग्य झाले आहे याची जाणीव मला आणि माझ्या घरच्यांना ताईच्या लग्नात झाली, जेव्हा लोकांनी बाबांना विचारलं, ‘काय देशमुखसाहेब अवनीचं लग्न कधी करणार आता?’ त्या क्षणी आई-बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग भयंकर टेन्शन यायला लागलं.
अगदी या क्षणापर्यंत मी माझ्या स्वप्नांच्या जगात वावरत होते. त्या जगात जागा होती फक्तमला, माझ्या ताईला, आई-बाबांना त्याचबरोबर त्या राजकुमाराला जो घोडय़ावर बसून येईल आणि मला घेऊन जाईल. माझ्यासाठी आयुष्याचा अर्थ वर्तमानाला एन्जॉय करणं हाच होता. माझी आवड कॉम्प्युटरवर नवीन नवीन डिझाइन्स तयार करण्यात, मत्रिणींबरोबर वेळ घालवण्यात आणि अडलेल्यांना तन-मन-धनाने मदत करण्यात होती. घरातली कामं करणं, स्वयंपाक करणं यात मला रसच नव्हता. आई म्हणायची, ‘कसं होणार आहे या पोरीचं सासरी गेल्यावर कुणास ठाऊक? हिची सासू मलाच म्हणेल, काही शिकवलं नाही आईने, बस पाठवून दिलं.’ यावर मी फक्त हसायचे आणि विषय टाळून तिथून निघून जायचे.
आई-बाबांनी लवकरच माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. तशी दिसायला बरी असल्याने आणि शिक्षण चांगलं असल्याने मागणी लवकर यायला लागली. मला एकूण तीन स्थळं आली. त्यातलं तिसरं स्थळ सर्वच दृष्टींनी योग्य होतं. ते स्थळ होतं नागपूरच्या अनुपम श्रीहरी गोखलेंचं. हा मुलगा मुंबईच्या एका कंपनीत सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करीत होता. त्याचा फोटो जेव्हा बाबांनी दाखवला तेव्हा मी त्याला रिजेक्टच करणार होते, कारण फोटोत तरी तो मला अजिबात आवडला नव्हता. मग ‘ममाज बॉय वाटतो, खूपच गंभीर दिसतो, मुंबईला राहतो, मला नाही जायचंय मुंबईला, नाही करायचं मला याच्याशी लग्न,’ अशी कारणं मी बाबांना दिली. पण ‘बघायला काय हरकत आहे?’ असं सांगून बाबांनी माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आणि मी हो म्हणाले. मला अजिबात वाटत नव्हतं की या स्थळाकडून मला पसंती येईल. कारण गोखले म्हणजे कोकणस्थ आणि आम्ही देशमुख देशस्थ. कोकणस्थ आणि देशस्थ यांच्यातलं शीतयुद्ध फार पूर्वापार चालत आलं आहे. मी असं ऐकलं होतं की, कोकणस्थ लोक फार काटेकोर, शिस्तबद्ध, कडक सोवळंओवळं पाळणारे आणि गंभीर असतात. त्यामुळे माझ्यासारख्या स्वच्छंदी देशस्थ मुलीला ते होकार का देतील? हेच माझ्या मनात होतं. पण म्हणतात ना, ‘जोडीयाँ स्वर्ग में बनती है’. पाहता पाहता बघण्याचा दिवस ठरला, वेळ ठरली. माझं बीपी वर-खाली होत होतं, कारण असा बघण्याचा कार्यक्रम माझा पहिलाच होता. एक मुलगी तयार होऊन येते आणि तिला अनोळखी असे काही जण परीक्षकाच्या नजरेने बघतात, हे जरा ऑडच होतं माझ्यासाठी. त्यात साडी घालून जायचं म्हणजे, नको रे बाबा, कुठे पडले वगरे तर? ‘मी साडी घालणार नाही.’ आईला असं सांगून मी मोकळी झाले. आई म्हणाली, ‘ठीक आहे. सलवार सूट घाल, पण दाखवायचा प्रोग्राम करायचाच आहे.’ इकडे टेन्शनपायी माझे हातपाय गळायला लागले. ताई सतत माझी िहमत वाढवत होती. एरवी कोणत्या मुलाने छेड काढल्यावर त्याच्या कानाखाली खाडकन आवाज काढणाऱ्या मला एखादा मुलगा बघायला आल्यावर इतकं टेन्शन येईल, असं कधीच वाटलं नव्हतं. त्यात कोण कोण येणार बघायला? कसे असतील ते? मुलगा कसा असेल? काय होईल? या सगळय़ा विचारांनी माझं डोकं गरगरायला लागलं होतं.
ठरल्या दिवशी मुलाकडली मंडळी आली. आई-वडील आणि मुलगा तिघंच. मला जरा आश्चर्यच वाटलं. नाही तर लोक मुलगी बघायला गेले की अख्खं गाव गोळा करून नेतात. आत्या, मामा, मावशी, काका, काकू परंतु हे तिघंच आले. त्यांचं म्हणणं होतं की निर्णय शेवटी आम्हालाच घ्यायचा आहे, योग जुळले तर पुढे सगळय़ांची भेट होईलच. हा त्यांचा साधेपणा अगदी पहिल्यांदा माझ्या आणि कदाचित माझ्या घरच्यांच्या मनालाही स्पर्श करून गेला.
सगळय़ांच्या थोडा वेळ इकडतिकडच्या गप्पा झाल्या आणि मग मला बोलावण्यात आलं. मी स्वत:ला सावरून हॉलमध्ये आले आणि मुलाच्या आईजवळ बसले. मुलाची आई म्हणजे कदाचित माझी भावी सासू. आजूबाजूच्या वातावरणात आणि टीव्हीवरील मालिकांमुळे सासू ही नेहमी खाष्टच असते, असा माझा समज होता. पण या बाईंकडे पाहिल्यावर त्या कुठल्याच दृष्टीने सासूसारख्या वाटत नव्हत्या. उंची साधारण माझ्याएवढीच, दिसायला सुंदर, शांत हसरा असा चेहरा. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, हसल्या आणि माझं टेन्शन कुठल्या कुठे पळून गेलं. कारण त्यांच्या डोळय़ांत मला माझ्या आईचे भाव दिसले, मी जरा सावरले. मग काहीतरी विषय निघावा म्हणून मुलाच्या वडिलांनी मला शिक्षण वगरे विचारलं. ते दिसायला फार स्ट्रिक्ट वाटत होते परंतु त्यांच्याशी बोलत असताना एक गोष्ट जाणवली की, ते स्ट्रिक्ट जरी असले तरी ते माझ्या बाबांसारखेच साधे आणि मोकळेपणाने बोलणारे आहेत. त्यांच्याशी बोलून माझ्या डोक्यावरचं टेन्शन जरा अजून हलकं झाल्यासारखं वाटलं.
आता माझ्यासमोर सगळय़ात कठीण प्रसंग होता. कारण मला आणि त्या मुलाला आमच्या घरच्यांनी बोलायला वेगळय़ा खोलीत पाठवलं. इतका वेळ त्या मुलाकडे मी डोळे वर करूनही पाहिलं नव्हतं. त्याच्याशी एकटं जाऊन बोलायचं? मनात भीती तर होतीच पण अनेक प्रश्नही होते की, ‘मी याच्याशी काय बोलू? या अध्र्या तासाच्या बोलण्यात ‘आम्हाला आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहायचं आहे का?’ हे कसं ठरवता येईल? दुकानात गेल्यावर कपडे घेतानाही मी यापेक्षा जास्त वेळ लावते. व्यवस्थित पारखून-निरखून पसंत पडला तरच ड्रेस घेते आणि आयुष्याचा एवढा मोठा निर्णय इतक्या सहजतेने कसा घेता येईल?’ या विचारातून स्वत:ला बाजूला सारून मग मी त्याच्यासोबत खोलीत गेले. आम्ही दोघंही समोरासमोरच्या खुच्र्यावर बसलो. माझ्यातली सगळी िहमत एकवटून मी त्याच्याकडे पाहिलं तर तो तसा नव्हताच दिसायला जसा मला फोटोमध्ये वाटला होता. माझी पहिली प्रतिक्रिया होती, ही इज सो हँडसम! गोरा गोरापान, डार्क निळय़ा रंगाचा शर्ट, डोळय़ांवर रिमलेस चष्मा, दिसायला अगदी देखणा. अगदी माझ्या स्वप्नातल्या राजकुमारासारखा. मनातल्या मनात मी स्वत:वर जरा रागावलेच, ‘इतक्या चांगल्या मुलाला तू नाव ठेवलंस?’ त्याच्याकडे बघून असं वाटलं की, त्यालासुद्धा सुचत नव्हतं माझ्याशी काय बोलायचं ते? थोडा वेळ आम्ही दोघंही गप्पच होतो. आम्ही एकमेकांकडे पाहिलं, हसलो आणि परत इकडे-तिकडे बघायला लागलो. मग त्या मुलानेच बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, ‘तुमच्याबद्दल बाहेर सगळं कळलंच, तुम्हाला माझ्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारा.’ त्याला काय विचारावं मला सुचेना. थोडा वेळ थांबून मी म्हणाले, ‘तुम्ही मुंबईला नोकरी करता.. मग राहायला स्वत:चं घर आहे की भाडय़ाने राहता?’ या क्षणी हा प्रश्न विचारणं कितपत योग्य होतं मला ठाऊक नाही. परंतु त्या क्षणाला जे सुचलं ते विचारून मी मोकळी झाले. तो थोडा हसला आणि म्हणाला, ‘मी सध्या भाडय़ाने राहतो. पण मी मुंबईला फ्लॅट बुक केला आहे.’ मग मी त्याला अजून असेच काही प्रश्न विचारले. थोडंफार माझ्याबद्दल, माझ्या घरच्यांबद्दल सांगितलं. आमच्या बोलण्यात एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तो माझ्याकडे बघून फार कमी वेळा बोलला. एरवी त्याची नजर खालीच. अर्धा-पाऊण तास त्याच्याशी बोलून इतकं तर नक्कीच समजलं की हा साधा, सरळ आणि डिसेंट मुलगा आहे. आमच्या त्या पहिल्या भेटीत तो माझ्या मनात छोटीशी का होईना पण जागा करून गेला.
आमचं बोलणं झाल्यावर आम्ही हॉलमध्ये आलो. थोडा वेळ सगळय़ांच्या गप्पा झाल्या आणि ‘मी तुम्हाला नंतर फोन करतो,’ असं माझ्या बाबांना सांगून ते लोक घरी परतले. ते गेल्यावर माझ्या घरच्यांनी सांगितलं की, ‘लोक फार साधे आहेत. मुलगा एकदम चांगला आहे. त्यांच्याकडून होकार आला तर आपण नाही म्हणायचं नाही.’ बाबांनी मला विचारलं, ‘तुला काय वाटतं?’ मी म्हणाले, ‘तुम्ही म्हणाल तसं.’ आता तो मलाही आवडला आहे, हे मी माझ्याच तोंडानं त्यांना कसं सांगणार होते? आणि मनात हा विश्वास तर होताच की माझे आई-बाबा माझ्यासाठी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाहीत. आम्ही सगळेच त्यांच्या होकाराची वाट बघत होतो.
एंगेजमेंट आणि लग्न यांच्यामधले क्षण हे सोनेरी क्षण असतात. ते क्षण आम्ही दोघांनीही पूर्णपणे अनुभवले. आणि त्यांच्या अनमोल आठवणी मनाच्या एका कप्प्यात साठवूनही ठेवल्या.
एका रविवारच्या सकाळी मुलाच्या वडिलांचा फोन आला, ‘आम्हाला मुलगी पसंत आहे परंतु एकदा मुलाला आणि त्याच्या आईला मुलीशी बोलायचं आहे.’ बाबा म्हणाले, ‘ठीक आहे. चालेल आम्हाला. काही हरकत नाही.’ मी विचार केला, ‘मुलाला बोलायचं आहे एकदा हे समजू शकते परंतु त्याच्या आईला माझ्यासोबत काय बोलायचं असेल?’ माझी इंटरव्हय़ू द्यायची तयारी परत सुरू झाली. फरक फक्त इतकाच होता की, हा इंटरव्हय़ू या वेळी टेलिफोनिक होता. मुलगा मुंबईला राहत असल्याने तो फोन कधी करेल हे आधीच ठरलं होतं. ठरल्या वेळी माझ्यासकट घरी सगळेच त्याच्या फोनची वाट बघत बसले होते. त्याचा फोन आला आणि सगळे माझ्या अवतीभोवती गोळा झाले. तो काय बोलणार आहे हे ऐकण्यासाठी. आता सगळय़ांसमोर मी कसं आणि काय बोलणार होते त्याच्याशी? मी उठून माझ्या खोलीत गेले. आम्ही जवळजवळ दीड तास बोलत होतो. त्याने मला फोन त्याच्याबद्दल, त्याच्या फॅमिलीबद्दल सांगायला आणि अर्थातच माझा निर्णय ऐकायला केला होता. मी खोलीतून बाहेर येईपर्यंत माझ्या घरच्यांचा श्वास अडकला होता. मी बाहेर आले आणि आईला सांगितलं की, मी त्याला होकार दिला. त्या क्षणी सगळय़ांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. त्यांना इतकं आनंदी याआधी मी कधीच पाहिलं नव्हतं. बाबांनी लगेच मुलाच्या वडिलांना फोन केला आणि ही आनंदाची बातमी दिली. यासोबतच आमच्या लग्नाच्या बोलणीला सुरुवात झाली.
हे सगळं सुरू असतानाच माझ्या मनात हा प्रश्न होता की त्याच्या आईला माझ्यासोबत काय बोलायचं असेल? या विचारांचं चक्र माझ्या डोक्यात सुरूच होतं. तोच त्यांचा फोन आला. त्यांनी मला त्यांच्या घरचे सणवार आणि त्यांच्या घरच्या पद्धतींबद्दल माहिती करून द्यायला फोन केला होता. त्यांचं म्हणणं होतं की, ‘जी नवी मुलगी या घरात येणार आहे तिला या घरातल्या पद्धतींची कल्पना असायला हवी जेणेकरून तिला अ‍ॅडजेस्ट व्हायला त्रास होणार नाही.’ त्यांचं बोलणं झाल्यावर त्यांनी मला विचारलं, ‘तुला काही सांगायचं असेल तर सांग.’ मला सांगायचं तर होतंच पण सांगू की नको या द्विधा मन:स्थितीत मी अडकले होते. मनाला हे ठाऊक होतं की कोणत्याही नवीन नात्याची सुरुवात खोटं बोलून करायची नसते. मी ठरवलं. त्यांना सगळं खरं खरं सांगायचं. मी म्हणाले, ‘ मला थोडं सांगायचं आहे.’ त्या म्हणाल्या, ‘बोल ना.’ परिणामांची चिंता न करता मग मी त्यांना सांगितलं, ‘मला स्वयंपाक करता येत नाही, पोळ्या येत नाहीत, भाज्या एक-दोन मोजक्याच येतात. पुरणाची पोळी तर अजिबातच येत नाही.’ मला वाटलं होतं त्या नाराज होतील पण त्या हसल्या आणि म्हणाल्या, ‘अगं ती काही मोठी गोष्ट नाही. मी पण स्वयंपाक लग्नानंतरच शिकले. तुझी शिकायची इच्छा आहे ना? मग येईल सगळं हळूहळू.’ त्यांची इतकी साधी प्रतिक्रिया असेल, असं मला वाटलचं नव्हतं. त्यांनी मला आईसारखंच समजून घेतल्यासारखं वाटलं. या नवीन नात्याला सामोरं जायला मी हळूहळू तयार होतं होते.
लवकरच आमची एंगेजमेंट झाली, लग्नाची तारीख निघाली. माझी आणि अनुपमची एकमेकांसोबत बोलायला सुरुवातही झाली. असं म्हणतात की, एंगेजमेंट आणि लग्न यांच्यामधले क्षण हे सोनेरी क्षण असतात. ते क्षण आम्ही दोघांनीही पूर्णपणे अनुभवले. आणि त्यांच्या अनमोल आठवणी मनाच्या एका कप्प्यात साठवूनही ठेवल्या. अनुपमसोबत बोलताना वेळ कसा जायचा कळायचंच नाही. फार कमी वेळात तो माझा चांगला मित्र झाला. त्याच्याशी बोलणं, त्याच्यासोबत गोष्टी शेअर करणं मला आवडायला लागलं. मी त्याच्यावर स्वत:पेक्षाही जास्त विश्वास ठेवायला लागले. माझ्या आयुष्यातली एकूण एक गोष्ट मी त्याला सांगितली. अगदी मला आवडणाऱ्या मुलापासून ते मला प्रपोज करणाऱ्या मुलांपर्यंत सगळं. त्यानेही कधीच मनात अढी धरून ठेवली नाही. तोही माझ्यासोबत तितक्याच मोकळेपणाने बोलत होता. या सगळय़ात कधी मी त्याच्या प्रेमात पडले मला कळलचं नाही. पण त्या वेळी तो मला त्याची चांगली मत्रीणच समजत होता. त्याला माझी काळजी होती, माझ्यासाठी वेळ होता, माझ्या सुखदु:खात तो सहभागी होता, पण तो माझ्यावर प्रेम करत नव्हता. त्याचं म्हणणं होतं की, प्रेम इतक्या लवकर होत नाही कुणावर. ते हळूहळू सहवासानेच होतं. त्याचं म्हणणं बरोबर असेलही कदाचित, परंतु माझ्या आयुष्यातला तो पहिलाच माणूस होता, ज्याच्यावर मी जिवापाड प्रेम केलं. आणि माझा हा विश्वास होता की कधी ना कधी तो पण माझ्यावर प्रेम करायला लागेल.
एकमेकांसोबत बोलून आम्हाला या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आली होती की, आम्हा दोघांच्या घरच्या वातावरणात फार मोठा फरक आहे. आमच्या आवडीनिवडी, राहण्याच्या पद्धती सगळंच अगदी वेगळं आहे. मला जी गोष्ट आवडायची नेमकी तीच त्याला आवडत नव्हती. आम्हाला एकमेकांची मतं कधीच पटायची नाहीत. त्यावरून बरेचदा आमचे वादही झाले. मग आम्ही ठरवलं की एकमेकांना बदलण्यापेक्षा आधी स्वत:लाच थोडं बदलावं. त्यानंतर हळूहळू आपोआपच आमचे मतभेद दूर होऊ लागले. आम्ही एकमेकांना अधिक चांगल्या रीतीने समजून घ्यायला लागलो.
याचदरम्यान मी माझ्या सासूबाईंच्या सतत संपर्कात होते. त्यांचं आणि माझं नातं अगदी आई-मुलीच्या नात्यासारखं झालं. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की, ‘आपल्या दोघींमध्ये कधीच कुणा तिसऱ्याला आणायचं नाही, तुझ्याबद्दल मला काही वाटलं तर मी तुला सांगीन आणि माझ्याबद्दल तुला काही वाटलं तर तू नि:संकोचपणे मला सांगायचंस.’ मी अगदी तसंच केलं. आम्ही दोघी आई-मुलीसोबतच चांगल्या मत्रिणीही झालो.
आमच्या लग्नाचे दिवस हळूहळू जवळ येत होते तशी मी अनुपममध्ये अधिकाधिक गुंतत चालले होते. तो मुंबईला असल्याने आमची भेट या काळात फक्त एकदाच झाली. दिवाळीच्या निमित्ताने तो नागपूरला आला. मी आणि आई-बाबा त्या वेळी नागपूरला गेलो. आमच्या एंगेजमेंटनंतर आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना भेटलो त्यामुळे साहजिकच दोघांनाही वाटत होतं की थोडा वेळ तरी एकांतात घालवावा. आमच्या घरच्यांनी कदाचित आमच्या मनाची अवस्था जाणली आणि आम्हाला बाहेर फिरायला पाठवलं. आम्ही दोघं टू व्हीलरवर बाहेर पडलो. दोघांमध्ये थोडं अंतर ठेवून मी त्याच्या मागे बसले. तो मला बरेचदा म्हणाला, ‘तू आरामात बस ना.’ मला जाणवत होतं की त्याची अपेक्षा होती मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसावं. पण माझी िहमत होत नव्हती. आम्ही सीसीडीमध्ये गेलो, इकडेतिकडे फिरलो, बराच वेळ गप्पा केल्या आणि मग घरी यायला निघालो. घरी परतताना मी फार िहमत करून त्याच्या खांदय़ावर हात ठेवला. मी हात ठेवल्या ठेवल्या त्याने गाडी थांबवली. माझा हात पकडला आणि मला म्हणाला, ‘अवनी आय लव्ह यू.’ इतके दिवस मी जे ऐकायची वाट बघत होते ते माझ्या होणाऱ्या नवऱ्याने नागपूरच्या एका नाल्यावर पहिल्यांदा मला म्हटलं. आम्ही इतक्या ठिकाणी फिरलो पण मनातलं प्रेम व्यक्त करायला त्याने नालाच का निवडला हे मला अजूनही कळलं नाही. त्याचा स्वभाव असाच सर्वापेक्षा वेगळा, मनातले भाव व्यक्त करायला त्याला कधीच कुठल्या वातावरणाची गरज भासली नाही. त्याचं मन अगदी स्वच्छ होतं आणि म्हणूनच मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं.
आमचं लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडलं. आम्ही दोघं फिरायला केरळला गेलो. या चार-पाच दिवसांत आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो. आमच्या दोघांचंच वेगळं असं जग निर्माण झाल्यासारखं वाटत होतं. आम्हाला परस्परांबद्दल प्रेम होतं, आदर होता परंतु आपल्या वागण्याने समोरच्याचं मन दुखावलं जाऊ नये ही भीती पण होती. आमचे स्वभाव अगदी भिन्न असले तरी आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा सतत प्रयत्न करत होतो. कारण यापुढील संपूर्ण आयुष्य आम्हाला सोबत आनंदाने जगायचं होतं. आमच्यातले दोष बाजूला सारून एकमेकांचा हात घट्ट पकडून आम्ही आमच्या नवीन आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात केली.
लग्न करून मी आणि अनुपम मुंबईला राहणार होतो. सासऱ्यांची नागपूरला नोकरी असल्यामुळे ते दोघं तिथेच राहणार होते. आता समोर येणारा प्रसंग माझ्यासाठी फार अवघड होता. कारण मुंबईला आम्ही दोघंच राहणार होतो आणि घरकामातलं, स्वयंपाकातलं मला काहीच येत नव्हतं. यापुढे मी कसं मॅनेज करणार होते माझं मलाच ठाऊक नव्हतं.
आम्ही मुंबईला पोहोचलो तर घर सासूबाईंनी अगोदरच सेट करून ठेवलं होतं. माझ्या या गृहिणीच्या नव्या भूमिकेत अनुपमबरोबरच माझा सगळय़ात मोठा आधार होत्या माझ्या सासूबाई. ‘तुला हे येत नाही ते येत नाही,’ अशा प्रकारचं कुजकं बोलून त्यांनी मला कधीच कमी लेखलं नाही. उलट प्रत्येक वेळी त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. मग ते मला स्वयंपाक शिकवताना असो, संसाराच्या जबाबदाऱ्या समजावून सांगताना असो, माझं आणि अनुपमचं भांडण झाल्यावर आम्हा दोघांनाही प्रेमाने, प्रसंगी रागावून योग्य सल्ला देताना असो किंवा लोकांनी मला मारलेल्या टोमण्यांना खडसावून प्रत्त्युत्तर देताना असो. भाजीला फोडणी कशी द्यायची इथपासून ते नवऱ्याला शिस्त कशी लावायची इथपर्यंत सगळं त्यांनी मला फोनवर शिकवलं. जेव्हा जेव्हा त्यांना शक्य व्हायचं तेव्हा तेव्हा त्या आणि सासरे आमच्या जवळ येऊन राहायचे. माझ्या सासू-सासऱ्यांनी कधीच मला माझ्या आई-वडिलांची कमतरता भासू दिली नाही. माझ्यासारख्या मनस्वी मुलीला एक जबाबदार गृहिणी बनवण्यात माझ्या सासू- सासऱ्यांचा आणि अनुपमचा खूप मोठा वाटा आहे.
लोक म्हणतात की मुलीचं लग्न झालं की तिचं आयुष्यच बदलून जातं. नवरा, सासू-सासरे, मुलं, नातेवाईक यांच्यासाठी जगता जगता ती स्वत:चं अस्तित्वच विसरून जाते. परंतु ज्या घरात कुठल्याही प्रसंगी सतत सोबत असलेला अनुपमसारखा नवरा, आपल्या सुनेला आईच्या मायेने कुशीत घेऊन सगळे अपराध पोटात घालणारी सासू आणि वडिलांसारखे पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे सासरे असतील त्या घरात येणारी मुलगी ही नेहमी मुलगीच असते. सून कधीच होत नाही आणि हे मी पूर्णपणे अनुभवलं गोखलेंच्या घरात.
अ‍ॅरेंज मॅरेज असलं तरी आमचं लग्न वेगळं आहे. वरून चारचौघांसारखंच वाटत असलं तरी ते इतरांपेक्षा निराळं आहे. मी आज हे ठामपणे सांगू शकते, कारण इतर नवऱ्यांसारखा माझा नवरा त्याची मतं माझ्यावर लादत नाही, सासू-सुनेची त्रासदायक भांडण होत नाहीत, आमच्या घरात मला माझं असं स्थान आहे, स्वत:चं अस्तित्व विसरून जगण्यापेक्षा प्रत्येकाने आपलं असं एक अस्तित्व निर्माण करून जगावं यावरच सगळय़ांचा विश्वास आहे, सगळय़ांच्याच मनात एकमेकांसाठी भरपूर प्रेम आहे, आदर आहे. माझ्या लग्नाचं वेगळेपण माझ्या घरातल्या माणसांमुळे आहे. आणि म्हणूनच माझ्या लग्नाची गोष्ट सर्वापेक्षा वेगळी आहे.
6:01 PM

Yanda Kartavya aahe ka?




यंदा कर्तव्य आहे का? मुला मुलींच्या आईवडिलांना विचारला जाणारा हमखास प्रश्न. पण समजा असेल तर मग तुम्ही लग्न करणार तरी कसं.. थाटामाटात की बजेटमध्ये? लग्नाच्या बदलत्या ट्रेंडवर टाकलेला एक दृष्टीक्षेप.
साधारण १५ ते १६ वर्षांपूर्वी आलेल्या हम आपके है कौन या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच वळणावर आणले. कुणी हा चित्रपट पाहून लग्नाची कॅसेट आहे असं म्हटलं तर कुणी माधुरी आणि सलमानच्या केमिस्ट्रीवर मनापासून चर्चा केली. असो, या चित्रपटातून एक मात्र नक्कीच शिकलो ते म्हणजे लग्न कसं करावं. चित्रपट पाहिल्यानंतर लग्न करण्याच्या पद्धतीत आपसूक बदल होऊ लागला. लग्न हा केवळ कुटुंबाचा सोहळा नाही तर त्याला इव्हेंटच स्वरूप आलं. केवळ प्रतिष्ठा म्हणून नाही तर चर्चा म्हणून लग्नाचा सोहळा अधिक दिमाखदार होऊ लागला. आज तर लग्न म्हणजे एक इव्हेंट झालेला आहे. जिथे घरातील मोठय़ा आजी, काकी, मामी सरबराई करण्यासाठी पुढे पुढे करत नाहीत. तर काम करण्यासाठी असतो वेडिंग ऑर्गनायझर. एखादं नाव इंग्रजाळलेलं असलं तर तसं वजनही त्या नावात असतं. अर्थात वेडिंग ऑर्गयनायझरचं काम केवळ नावापुरतं नाही तर त्याला ते सिद्ध करूनही दाखवावं लागतं. नुकत्याच आलेल्या बँड बाजा बाराती या चित्रपटाने लग्नाचं आयोजन कसं करू शकतो आणि त्याकरता काय करावं लागतं हेही उत्तमपणे दाखवलंय. पूर्वी लग्न म्हटलं की किमान दोन घरात देण्याघेण्यावरून कुरबुरी कटकटी यांचं सावट लग्नावरही उमटायचं. वधूचा पिता चेहऱ्यावरून कसा दिसतोय आणि तो कितपत आठया पाडून आहे यावर त्या लग्नाचा नूर कळायचा. आज मात्र ही दु:खाची सर्व जळमटंच दूर सारली गेली आहेत. वधू पिता अगदी ऐटीने लग्नात मिरवत असतो. नवरीच्या आईची लगबग इतकी कमी झालीय की केवळ स्वतच्या ग्रुमिंगकडे लक्ष देऊ लागलीए. खास नवऱ्या मुलाची आई आणि नवरीची आई मंडपातल्या गडबडीकडे न बघता आपल्या मेकअपकडे अधिक लक्ष देऊ लागल्यात. मॅचिंगचा जमाना तर आता कालबाह्य झालाय. मिक्स अ‍ॅण्ड मॅचलाच कसं ग्लॅमर मिळवून द्यायचं याकरता त्यांच्याकरता स्पेशली एक डिझायनर आणला जाऊ लागलाय.
लग्नाच्या बदलत्या ट्रेंडबद्दल बोलताना गिरीश थापर म्हणतात, चित्रपटांनी लग्नाच्या ट्रेंडमध्ये मोठय़ा प्रमाणात चेंज आणला. गेली २५ वर्षे ते या इव्हेंट ऑर्गनायझेशनमध्ये आहेत. थापर घराण्याची ही चौथी पिढी. खासकरून सेलिब्रिटींची लग्न ऑरगनाईझ करण्यात यांचा हातखंडा आहे. ते म्हणतात, अलीकडे उत्तमोत्तम काय द्यावं आणि कसं करावं याकडे आमचा कल असतो. उत्तम म्हणजे काय तर उंची लग्न करायची. म्हणजे समजा गेल्या महिन्यात आम्ही एखादं लग्न केलं. तर नवीन येणारी पार्टी गेल्या लग्नात काय सुविधा दिल्या हे विचारते आणि त्यापेक्षा चांगलं लग्न व्हायला हवं असं तोंडावर सांगून जातात. आता चांगल्यात चांगलं करायचं म्हणजे बजेटचा प्रश्न येतो. अनेक गोष्टींचे भाव वाढल्याने अगदी वरातीच्या घोडय़ापासून ते बुफेच्या व्हरायटीमध्येही बदल होतो. आज बुफेची व्हरायटी म्हणजे पाय दुखायला लागतील इतपत मोठ्ठी असते. हे सर्व पदार्थ खरंच कुणी खातं का यावर ते म्हणतात. हा प्रश्न प्रतिष्ठेचा असतो. सेलिब्रिटी किंवा राजकारणी यांच्या लग्नात येणारा क्राऊड हा वेगळाच असतो. तो केवळ एका ठराविक कम्युनिटीला समोर ठेवून आलेला नसतो. तर अतिशय भिन्न असलेल्या या क्राऊडला आकर्षण म्हणून भारतातील जवळपास सर्व प्रांतातले स्टॉल लावावे लागतात. याकरता आम्हाला खाण्यामध्येही अनेक नवीन ट्रेंडस् शोधावे लागतात. वेगळ्या पद्धतीचं उत्तम काय देऊ शकतो याचा शोध घ्यावा लागतो. त्याकरता अनेकदा आम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमधील शेफची मदत घेतो. एखादा नवीन पदार्थ लग्नात इंट्रोडय़ुस करून चालत नाही तर किमान ७ ते ८ पदार्थ नवीन रेसिपीजचे ठेवावेच लागतात. तरच ते क्लरईटस्ना आवडतात. हे नवीन पदार्थ आमच्याकडून टेस्टिंगला क्लाईंटकडे पाठवले जातात. त्यानंतर या पदार्थाची फायनल पसंती ठरते.
लग्नाआधीचे १५ दिवस तर आम्ही दोन्ही घरांना एक टाईम टेबल देतो. त्यानुसार तिथली कामं कशी व्हावीत हे सर्व आमच्याकडून ठरवलं जातं.
यासंदर्भातील एक विनोदी किस्सा थापर सांगतात, एका नामांकित इंडस्ट्रियलिस्टला पाच वेळा विविध प्रकारच्या भाज्या पाठवण्यात आल्या होत्या. प्रत्येक वेळी त्यांची नापसंती असे. अखेर शेफने यावर एक उपाय केला. त्याने पहिल्या फेरीला पाठवलेल्या ७ भाज्यांचे प्रकार पुन्हा रिपिट केले आणि अखेर त्या भाज्यांना पसंती मिळाली. थापर म्हणतात, क्लाईंट पैसे खर्च करायला तयार असतो तेव्हा आमच्याकडून उत्तम कसं देऊ याचाच विचार अधिक करतो. एखाद्या गोष्टीत तडजोड करणं हे आम्हाला अजिबात परवडणारं नसल्याने आम्ही तडजोडीचा विचारच करू शकत नाही. पण क्लाईंटची आवड निवड नेमकी तुम्ही कशी ठरवता.. या प्रश्नावर अधिक बोलताना ते म्हणतात, मुलांना कुठल्या शाखेत प्रवेश घ्यायचाय हे आपण त्याच्या कम्पॅटीबिलिटी टेस्टवरुन ठरवतो ना तशीच पण एका वेगळ्या प्रकारची टेस्ट आम्ही घेतो. आमच्याकडे काही प्रश्नांची यादी आहे. या यादीमध्ये प्रत्येक प्रश्नाला काही ऑप्शन्स आहेत. हे प्रश्न जो सोडवतो आणि तो कुठल्या ऑप्शनवर अधिक भर देतोय याकडे आमचं लक्ष असतं. अनेकदा प्रत्यक्ष भेटीत क्लाईंटला नेमकं काय हवंय हे मांडता येत नाही. अशा वेळी ही यादी उपयुक्त ठरते. एखाद्या लग्नाच्या मॅनेजमेंटची जबाबदारी नेमकी तुम्ही कशी आखता? लग्न म्हणजे बेसिक काय तर मुला मुलीची पसंती ती झाल्यावर प्रत्येक गोष्ट आमच्याकडून केली जाते. म्हणजे अगदी मुला मुलीने कुठला ड्रेस डिझायनर निवडावा इथपासून. आम्ही ऑप्शन्स सजेस्ट करतो. लग्नाआधी आमचा काही प्लॅन असतो त्यानुसार दोन्ही लग्नघरात आम्ही कामं करवून घेतो. उदा. देवळात जाण्यापासून ते अगदी पत्रिका वाटण्यापर्यंत. या सर्व विविध कामांसाठी आमच्याकडे माणसं नेमलेली असतात. लग्नाआधीचे १५ दिवस तर आम्ही दोन्ही घरांना एक टाईम टेबल देतो. त्यानुसार तिथली कामं होताहेत किंवा ती कशाप्रकारे करवून घ्यायची हे सर्व आमच्याकडून ठरवलं जातं. अनेकदा काही घरांमध्ये गोंधळ हा फार असतो. अशावेळी लग्नाच्या दिवशी उगाच काही गोंधळ उडू नये याकरता त्यांना उत्तम ऑरगनाईज्ड करणं हे आमचं काम असतं. म्हणजे अगदी आदल्या दिवशी कपडेही आम्ही घरी पोहचवतो. लग्नाच्या दिवशी त्या व्यक्तीला फक्त ते कपडे परिधान करून लग्नाला यायचं असतं. मेहंदी, संगीत आणि इतर अनेक प्रकार अलीकडे महाराष्ट्रीय लग्नात डोकावू लागलेत हा नवा बदलता ट्रेंड आहे का.. यावर थापर हसले. अधिक बोलताना ते म्हणतात, पूर्वी महाराष्ट्रीय माणूस लग्नात फारसा खर्च करत नव्हता. पण अलीकडे तोही या सर्व नव्या ट्रेंडस्ना आपलंसं करू लागलाय. अनेकदा तर प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून तो आवाक्याबाहेरचा खर्चही करू लागलाय. अलीकडे बहुतांश मुलं मुली परदेशात शिकण्यासाठी जातात. केवळ भारतात येऊन लग्न करायचा हा त्यांचा मानस असतो. अशा मुलांचे आई वडिल तर मुलांसाठी काय करू आणि काय नको याचाच विचार करतात. मुख्य म्हणजे पूर्वी किमान एका घरात तीन मुलं असायची. त्यानंतर ती संख्या दोनवर आली आता तर एक मुलगा किंवा मुलगी असते. मग तिचं लग्न आपण उत्तम केलं तर चारचौघांमध्ये आपलं नाव होईल या विचारानेही लग्नावर खर्च करण्याची संख्या वाढल्याचं थापर कबूल करतात. ते म्हणतात, लग्नाचा सिझन म्हणजे आम्हाला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. आता हा भाग झाला केवळ लग्नाच्या तयारीचा. याच तयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मंडप. गेली १७ वर्षे मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करणारे चंद्रकांत मुळीक आता या व्यवसायात अगदी उत्तम सेटल झालेले आहेत. ते म्हणतात, पूर्वी मंडप म्हणजे साध्या कपडय़ाचा किंवा अगदी तलम कपडय़ाचा असायचा. आता मंडपाच्या कपडय़ांमध्येही व्हरायटी आलेली आहे. मंडप म्हणजे केवळ झिरमिळ्या नाहीत. तर त्यालाही डेकोरेशन असायला हवं. बांबू आणि त्याच्यावर लावला जाणारा कपडा हा तलम किंवा साध्या कपडय़ाचा नको तर त्याला प्लॅस्टिकच्या वेली किंवा फुलांचं डेकोरेशन करावं लागतं. मंडपाची कमान कशी असावी याची डिझाईन अनेकदा क्लाईंट सुचवतात. बऱ्याचदा क्लाईंटस्ना मंडपचं डेकोरेशन हे त्यांच्या आवडीप्रमाणे हवं असतं. त्याकरता स्पेशली मंडप डिझाइन करावा लागतो. हा मंडप डिझाइन करताना खर्च हा अनेकदा अव्वाच्यासव्वा वाढतो. या वाढीव किमतीची कल्पना समोरच्या व्यक्तीला द्यावी लागते. काही मंडप बांधण्यासाठी कारागीर वेगळे बोलवावे लागतात त्यांचा खर्च वाढतो. काही मंडपाची उभारणी ही महालासारखी केलेली असते त्यामुळे ती उभारणी केवळ एका दिवसात होत नाही. तर किमान तीन दिवस आधी याकरता काम करावं लागतं. कुठेही लग्नाच्या दिवशी काही गोंधळ उडू नये याची जबाबदारी घ्यावी लागते. अशा अनेक गोष्टी आज मंडपाच्या बाबत बदललेल्या आहेत.
अलीकडे बहुतांश मुलं मुली परदेशात शिकण्यासाठी जातात. केवळ भारतात येऊन लग्न करायचा हा त्यांचा मानस असतो. अशा मुलांचे आई वडिल तर मुलांसाठी काय करू आणि काय नको याचाच विचार करतात.
मंडपाच्या बाबतीतला ट्रेंड आपण पाहिला पण इथे लाईटिंग डेकोरेशनही तितकंच महत्त्वाचं आहे. नरेन पांडे गेली दहा वर्षे खास लाईट सप्लायर्स या व्यवसायात आहेत. मुंबईतील अनेक नामांकित कार्यक्रमाच्या ठिकाणी यांच्या लाईटस्ना डिमांड आहे. पांडे लाईट डेकोरेशन संदर्भात म्हणतात की, अलीकडे चायना मेड वस्तूंना डिमाण्ड फार आहे. यामध्ये लाइटच्या व्हरायटीही अनेक पाहायला मिळतात. डिस्को लाईट आता आऊटडेटेड झाली असून, त्याजागी थीम लाईट आलेली आहे. थीम लाईट म्हणजे प्रत्येक लग्नाची एक थीम ठरलेली असते. या थीमनुसार लाइटिंग करावी लागते. काही लग्नामध्ये लाइटिंग या प्रकाराला खूप अनन्यसाधारण महत्त्व असते. तर काहीजण लाइटिंग हा विषय दुय्यम मानतात. लग्नाच्या मैदानाभोवती किंवा हॉलच्या बाहेर लाईटस्चे कुठले इन्स्टुमेंट असावेत यातही अनेकदा चढाओढ असते. इलेक्ट्रिकल कारंजे तेही लाइटवर चालणारे असे नानाविध प्रकार अलीकडे डिमाण्डेड आहेत.
हे सर्व पाहिल्यावर खूप प्रसिद्ध जाहिरात आठवते.. हम बारातीयों का स्वागत..करेंगे.. आता तुम्ही तुमच्या वऱ्हाडाचं स्वागत कसं करणार आहात? सो लेटस् रेडी फॉर फन..