bhavpurna shradhanjali marathi
bhavpurna shradhanjali banner editing
bhavpurna shradhanjali banner download
bhavpurna shradhanjali banner editing online
bhavpurna shradhanjali sticker
bhavpurna shradhanjali in marathi png
bhavpurna shradhanjali frame
bhavpurna shradhanjali kannada images
dashkriya vidhi banner app
dashkriya vidhi banner psd
dashkriya vidhi banner background hd
dashkriya vidhi patrika in marathi
dashkriya vidhi banner png
terava vidhi invitation in marathi
dashkriya vidhi invitation card format
dashkriya vidhi banner free online
indian christian wedding cards
christian wedding cards images
christian wedding cards online free
christian wedding cards in english
wedding card front page matter in hindi
christian wedding cards online
christian wedding cards in telugu
indian christian wedding cards
christian wedding cards in english
christian wedding cards online
christian wedding cards online free
christian wedding cards images
wedding card front page matter in hindi
लक्ष्मणाचं रामराज्य!
द्वारकानाथ संझगिरी
कोलकत्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध फॉलो ऑनचं विष पचवून आपण जिंकलो, त्याला गेल्या आठवड्यात २० वर्षं झाली. अजूनही आपण एक परिकथा ऐकलीय असंच वाटतं. स्टीव्ह वॉ तेव्हा सिकंदराच्या थाटात आला होता. त्या कसोटीच्या चौथ्या दिवशी मॅच संपणार, तो जग जिंकल्याचं घोषित करणार असे सर्व मांडे तो मनात खात होता. मद्याची लाडकी बाटली त्यानं ड्रेसिंग रूममध्ये आणून ठेवली होती. पण एका माणसानं त्याचं स्वप्न उद्ध्वस्त केलं. त्याच नाव होतं : वांगीपुरुप्पू वेंकटसाई लक्ष्मण. या लक्ष्मणानं कांचनमृग पकडला. सीतेचं अपहरण होऊ दिलं नाही. जुन्या लक्ष्मणरेषा पुसून टाकल्या. आणि एक नवीन लक्ष्मणरेषा आखली.
त्या दिवशी लहानपणी शिकलेला एक वाक्प्रचार अपुरा वाटला.‘पराभवाच्या कराल दाढेतून बाहेर काढणं वगैरे...’ लक्ष्मणनं विजयाचा घास स्टीव्ह वॉ याच्या जठरातून बाहेर काढला. तो घास निघाला होता आतड्यांमध्ये जायला... पुढं जाण्याआधी थोड्या आठवणी जागवत ठेवतो.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. भारतीय संघ १७१ धावांत कोसळला. त्यांनी फॉलो ऑन दिला. फरक तब्बल २७४ धावांचा. स्टीव्ह वॉ याचं चुकलं असं कुणाला वाटलं नाही. एक माणूस होता, ज्याला ‘स्टीव्ह चुकला’ असं वाटलं. आमचा वासू परांजपे. त्याचा मित्र त्या वेळी ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूममध्ये होता. त्याला वासूनं सांगितलं :‘फॉलो ऑन देऊ नका.’ त्याची स्टीव्ह वॉला सांगायची हिंमत झाली नाही. हे अलीकडेच वासूनं पुस्तकात लिहिलेलं आहे. मी स्टीव्ह वॉ असतो तर वासूच्या पायावर डोकं ठेवलं असतं.
असो, तर काय सांगत होतो? हां, पहिल्या डावात लक्ष्मणनं ५९ धावा केल्या. त्या वेळी तो सहाव्या क्रमांकावर खेळला होता. दुसऱ्या डावात गांगुली मास्टरस्ट्रोक खेळला. त्यानं लक्ष्मणला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं. तरीही एक वेळ अशी होती की भारताची धावसंख्या ४ बाद २३८ होती आणि फॉलो ऑनच कर्ज चुकतं झालेलं नव्हतं. तिथून हा सामना भारतानं जिंकला.
मॅच जिंकण्यात आणखी दोघांचा वाटा महत्त्वाचा होता. एक राहुल द्रविड, दुसरा हरभजनसिंग. राहुलनं १८० धावा करून ३७६ धावांची मोठी भागीदारी लक्ष्मणबरोबर केली. तलवारीला ढाल लागते, ती राहुलनं पुरवली आणि हळूहळू ती ढालसुद्धा तलवार झाली. समोर लक्ष्मणच्या रुद्रावतारानं प्रभावित होऊन राहुलच्या बॅटनं तांडवनृत्य शिकायला सुरुवात केली. त्यानं ५१ च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या.
दुसरा वाटा होता हरभजनचा. त्यानं १३ बळी सामन्यात घेतले. शेवटच्या दिवशी टी टाईमपर्यंत ऑस्ट्रेलियानं फक्त ३ बळी गमावले होते. तिथून हरभजननं मॅच जिंकून दिली. एरवी, हरभजन ‘मॅन ऑफ द मॅच’ झाला असता; पण लक्ष्मणच्या झंझावाताचा झपाटा असा होता की इतर वादळं किरकोळ वाटली. सन १९७१ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनला सुनील अशीच खेळी खेळला होता. पहिल्या डावात शतक ठोकून दुसऱ्या डावात द्विशतक.
२८१ च्या खेळीनं लक्ष्मण क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाला. विस्डेननं इतिहासातल्या सर्वश्रेष्ठ खेळीची एक यादी तयार केलीय. त्यात लक्ष्मणची खेळी सहाव्या क्रमांकावर आहे. का नसणार? तेल कुणीही पेटवेल, यानं पाणी पेटवलं!
चौथ्या दिवशी सकाळी त्यानं आणि राहुलनं पहिल्या तासात ओव्हरमागं ७ धावांच्या सरासरीनं धावा केल्या.
कुणासमोर? मॅग्रा आणि गिलेस्पी. लढाईत रक्ताचे पाट वाहतात. इथे चौकारांचे पाट वाहत होते. स्टीव्ह वॉ यानं कबूल केलं की ऑस्ट्रेलियन संघ प्रथम तिथं खचला. मग लक्ष्मणनं वॉर्न याला निःशस्त्र केलं. लेग स्टंपबाहेरच्या बूटमार्क्समधून तो चेंडू वळवत होता. लक्ष्मणनं त्याला लाँग ऑनला स्पिनच्या विरुद्ध दिशेला ड्राईव्ह मारले. हे सोपं नसतं. मग वॉर्ननं लेगला तटबंदी वाढवली. आणि पुन्हा लेगस्टंप बाहेरून चेंडू फिरवले. लक्ष्मणनं पुढं जात ऑफला ड्राईव्ह मारले. सर्वोच्च दर्जाचा फलंदाज फक्त हा खेळ खेळू शकतो. आता याच्या पुढं काय करावं ते आपल्याला कळेना, असं वॉर्न यानं कबूल केलं.
माणूस वादळ रोखू शकत नाही. ते ओसरेपर्यंत तो ते फक्त हताशपणे पाहू शकतो. ऑस्ट्रेलियानं ते केलं. तोपर्यंत विध्वंस होऊन गेला होता. संघाला पराभवापासून वाचवायला लक्ष्मण खेळलाच नव्हता, तो जिंकण्यासाठी खेळला होता. काही संकटं अशी टाळता येतात. लक्ष्मणनं कसोटी जिंकली. आणि मालिका जिंकली.
त्यानं आपल्या स्वभावापलीकडे काही केलं नाही. त्याआधी सिडनीला त्यानं १९८ चेंडूंत १६७ धावा ठोकल्या होत्या. त्यात २७ चौकार होते. तो काय चेंडूच्या योग्यतेनुसार खेळला? ऑस्ट्रेलियन गोलंदाज एका फलंदाजाला २७ चौकार देऊ शकत नाहीत. ते त्यानं त्यांच्याकडून लुटले. त्यांच्या भावना न दुखावता. त्यांना सौंदर्याची भूल घालून. २७ चौकारांचे शिलालेख त्यानं प्रेक्षकांच्या मनावर कोरले. सचिननं त्याला खूश होऊन ओकली गॉगल दिला. तो स्वाक्षरी देत असताना एक वयस्कर आवाज त्याच्या कामात घुमला...‘तू आज माझा दिवस सार्थकी लावलास,’ ते होते जॉर्ज हॅवर्ड. ऑस्ट्रेलियाचे तेव्हाचे पंतप्रधान!
त्यानंतरची ही त्याची मोठी खेळी.
‘राहुलसारखं खेळ,’ असं त्याला सांगणं म्हणजे देवानंदला धोतर नेसायला सांगण्यासारखं होतं. रसिकता शिस्तबद्ध होऊ शकते; संन्यासी नव्हे. ती शिस्तबद्ध झाल्यावर त्यानं सन २००३ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये धूमशान घातलं. तेव्हा ईयान चॅपेल त्याला ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’ असं म्हणाला होता.
लक्ष्मणची कसोटी सरासरी आहे ४६, जवळपास १३४ कसोटींत. तेही जास्त काळ सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करून. वर खेळला असता तर ५० पर्यंत गेला असता कदाचित; पण लक्ष्मणच्या सरासरीचं कुणाला काय देणं-घेणं! शॅम्पेन ही मद्यार्कावर मोजत नाहीत. महत्त्वाचं असतं ते तिचं फसफसून बाहेर येणं. लक्ष्मणची फलंदाजी हे सेलिब्रेशन होतं, आकडेमोड नव्हे.
भारतीय क्रिकेटच्या प्रत्येक युगात एक राम होता. नावं बदलली. कधी हजारे, कधी सुनील, कधी सचिन, कधी विराट; पण ज्या लक्ष्मणानं एका महत्त्वाच्या मालिकेत रामराज्य आणलं तो एकच. वांगिपुरुप्पू वेंकट साई लक्ष्मण.
(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)
सज्जन, सुसंस्कृत केन विलियम्सन
द्वारकानाथ संझगिरी
भारतीय संघानं कसोटी क्रिकेटची चॅम्पियनशिप न जिंकल्याबद्दल एक भारतीय म्हणून मला दुःख जरूर झालं; पण राष्ट्रप्रेमाचा भाग सोडला तर, क्रिकेटप्रेमी म्हणून एका सज्जन, सुसंस्कृत क्रिकेटपटूच्या संघाला यशानं ‘वरलं’ हे पाहून आनंदही झाला. ती चॅम्पियनशिप ‘सुस्थळी’ पडली. भारताबाहेरचे दोन क्रिकेटपटू मला प्रचंड आवडतात. एक दक्षिण आफ्रिकेचा ए. बी. डिव्हिलिअर्स (एबीडी) आणि दुसरा न्यूझीलंडचा केन विलियम्सन.
एबीडीनं वन डे आणि टी-२० ची फलंदाजी नावीन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेत नेऊन ठेवली, तर केननं, कसोटी फलंदाजीची सर लेन हटन, सुनील गावसकर, राहुल द्रविड यांच्या परंपरेची विझत चाललेली ज्योत प्रज्वलित केली!
दोन वर्षांपूर्वी ‘लॉर्डस्’वर पाहिलेला केन माझ्या डोळ्यासमोर आहे. कुठलाही सुपरस्टार नसलेल्या संघाला तो स्वतःचं नेतृत्व आणि स्वतःच्या बॅटमधून प्रेमानं वाहणाऱ्या धावांच्या जिवावर अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला होता. बरं, तो अंतिम सामना हरलाच नाही, सामना एकदा नव्हे तर, दोनदा बरोबरीत सुटला. तरी एका खुळ्या, काहीही लॉजिक नसलेल्या नियमामुळे इंग्लंडनं त्याच्या हातून विश्वचषक खेचून घेतला. दुर्भाग्यसुद्धा ‘आपण काय करून बसलो’ असं म्हणालं असेल त्या वेळी! पण केननं ते दुःख मनातच दाबून टाकलं. त्यातून निर्माण होणारी चीड, खदखद त्यानं आपल्या जिभेपर्यंत पोहोचू दिली नाही. ‘जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो खो गया मैं उस को भुलाता चला गया’ म्हणत त्यानं कसोटीच्या विश्व चॅम्पियन्सशिपच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली. पुन्हा तो संघ घेऊन शिखरावर आला. शिखर पुन्हा इंग्लंडमध्ये होतं; पण या वेळी त्यानं नशिबावर काहीही सोपवलं नाही. स्वतःच्या नेतृत्वावर आणि बॅटच्या जोरावर त्यानं संघाला विजय मिळवून दिला.
नियतीलाही प्रायश्चित्त घेतल्याचं समाधान मिळालं असेल! पण तेव्हाही केन तसाच शांत, सुसंस्कृत होता...त्या पराभवात होता तसाच.
ढगाळ वातावरण आणि पावसाची अपेक्षित ये-जा या बाबी लक्षात घेऊन त्यानं पाच वेगवान गोलंदाज खेळवले. ते पहिलं योग्य दिशेनं त्यानं टाकलेलं पाऊल होतं. टॉस जिंकून भारताला फलंदाजी दिल्यावर त्याच्या स्विंग गोलंदाजांना अपेक्षित यश सुरुवातीला मिळालं नाही; पण तरीही केन शांत होता. दुसऱ्या दिवशी त्यानं वेगवान गोलंदाजीमध्ये योग्य ते बदल केले आणि अक्षरशः प्रत्येक फलंदाजासाठी त्याच्या ताकदीनुसार किंवा कमकुवतपणानुसार त्यानं जाळं टाकलं. भारतीय फलंदाज त्यात अडकत गेले. रहाणे तर कमालीचा अडकला. न्यूझीलंडमध्ये वॅगनेरनं रहाणेला असंच वारंवार बाद केलं होतं; पण ठेच लागूनही रहाणे शहाणा झाला नाही.
क्षेत्ररक्षणात बदल करून योग्य जागी क्षेत्ररक्षक आणून ठेवल्यानंतर त्याच्या हाती थेट झेल जाणं यासारखी तृप्तता कर्णधाराला दुसरी नसेल. सन १९७१ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुराणीनं सोबर्सची विकेट काढल्यावर लॉईड बॅटिंगला आला आणि स्लिपमधला वाडेकर मिड ऑनला गेला. दुराणीला धक्का बसला. वाडेकरनं त्याला सांगितलं, ‘मी योग्य जागी उभा आहे.’ आणि अक्षरशः पुढच्या चेंडूवर लॉईडचा फटका थेट वाडेकरच्या पोटात आला. तिथं मॅच फिरली आणि त्याचबरोबर रबरसुद्धा. केनच्या बाबतीत हे दोनदा घडलं. दुसऱ्या डावात त्यानं शमीसाठी यष्टिरक्षकाच्या मागं अशा जागी एक क्षेत्ररक्षक ठेवला की तिथं सहसा कधी क्षेत्ररक्षक ठेवलाच जात नाही आणि त्याच्या डावपेचाला शमीच्या बॅटनं कुर्निसातच ठोकला! त्यानं त्याचा झेल त्या जागी उभ्या केलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात अक्षरशः सोपवला.
आपल्या विराट कोहलीचा चेहरा हा त्याच्या मनातल्या भावनांचा आरसा आहे. त्याचा राग, त्याची निराशा, आनंद, आश्चर्य जे काही त्याच्या हृदयात उमटतं ते त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. त्याचा चेहराच बोलतो असं नाही, त्याचं शरीरही बोलत असतं.
विराटच्या उलट केन आहे. त्याचा चेहरा हा ओपेक काचेसारखा आहे. साऊदीनं स्लिपमध्ये पंतचा झेल सोडल्यानंतर मनातून केन नक्कीच निराश झाला असेल. तडफडला असेल. चिडला असेल. आणि असं जर झालं नसेल ना तर तो माणूसच नाही! मात्र, असा कुठलाही भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. एक किंचित निराशा चमकून गेली एवढंच. कारण, तो क्षण मॅच हातून निसटवणारा क्षण ठरू शकत होता आणि त्याची दोन्ही डावांतली फलंदाजी ही मूर्तिमंत कसोटी फलंदाजी होती.
परवाच मी गुंडाप्पा विश्वनाथची मुलाखत वाचली. ‘कुठला फलंदाज तुला सर्वोत्तम कसोटी फलंदाज वाटतो?’ असं त्याला विचारलं गेलं. अगदी माझ्या मनातलं उत्तर त्यानं दिलं. तो म्हणाला, ‘केन विलियम्सन.’ त्यानं कारणही दिलं. तो म्हणाला, ‘फ्रंट फूट असो किंवा बॅक फूट, फिरकी गोलंदाजी असो किंवा स्विंग वेगवान गोलंदाजी, ऑफ साईड असो किंवा ऑन असो...त्याच्या फलंदाजीत चुका शोधणं हे अत्यंत कठीण आहे. जितकी तांत्रिक बाजू दणकट, तितकंच त्याचं टेम्परामेंटसुद्धा घट्ट आहे.’
मॅच जिंकताना रन रेट आपल्या कह्यात राहील हे केननं पाहिलं; पण त्या रन रेटसाठी फाजील आक्रमकता दाखवली नाही. केन आणि त्याचा आधीचा कर्णधार ब्रॅंड्स मॅक्कलम यांच्यात हाच फरक आहे. केनला समोर त्याचं ध्येय दिसत होतं. त्याला तो ध्येयाकडे जाणारा रस्ता दिसत होता आणि त्या रस्त्यावरून कसं चालायचं हे त्यानं पक्कं ठरवलं होतं. त्याचप्रमाणे तो चालत गेला.
मॅचच्या शेवटच्या दिवशी फलंदाजीचं वातावरण हे सर्वात पोषक असलं तरी छोटे पाठलाग मुळीच सोपे नसतात. आश्विनला लागोपाठ दोन बळी मिळाल्यानंतर न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ४४ होती आणि जवळपास १०० धावांचा पल्ला शिल्लक होता. त्याची मधली फळी अननुभवी आणि फारशी ताकदवान नाही, त्यामुळे जिंकण्यासाठी केननं शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं होतं. त्यानं अनुभवी रॉस टेलरला बरोबर घेऊन आपला दर्जा, आपला अनुभव आणि आपलं टेम्परामेन्ट पणाला लावलं. टेलर एरवी तसा आक्रमक फलंदाज आहे; पण समोर केनची फलंदाजी पाहून त्यानं केनचं टेम्परामेन्ट, केनचं शांत मन उसन घेतलं असावं!
न्यूझीलंड हा ५० लाखांचा देश आहे. त्यात क्रिकेट हा त्यांचा प्रमुख खेळ नाही. त्यातून उभारलेला संघ हा माणूस घेऊन लढतो. आणि समोर कोण होतं? तर दीडशे कोटींच्या देशातून उभारलेला संघ. सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून मिरवणारा देश... सर्वात श्रीमंत आणि सुपरस्टार्सनी भरलेला म्हणून मिरवणारा संघ...आणि तरीही या सज्जन, सुसंस्कृत कर्णधारानं सर्वसाधारण कसोटी दर्जाच्या खेळाडूंना बरोबर घेऊन या बलाढ्य संघाला हरवलं. कदाचित भारताची पत गेली नाही; पण न्यूझीलंडची पत मात्र खूपच वर गेली.
(सदराचे लेखक हे ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)